• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील सरकार ढोंगी आणि दुतोंडी ; संजय राऊत !

editor desk by editor desk
March 15, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यातील सरकार ढोंगी आणि दुतोंडी ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने गेल्या आठवड्यात अर्थसंकल्प जाहीर केला होता, आता सरकारविरोधात विरोधकांनी रान उठविले आहे तर आता महाराष्ट्र सरकार हे ढोंगी आणि दुतोंडी असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या आणि पाण्याच्या प्रश्नावर आतापर्यंत सरकारने तोंड उघडले नाही. हे सरकार बाकी सर्व प्रश्नांवर बोलतोय. राजकीय प्रश्नांवर बोलतात, व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतात, विरोधकांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर हे सरकार बोलायला तयार नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

बुलडाण्यातल्या ज्या तरुण शेतकऱ्याने आणि कृषी क्षेत्राचा पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या केली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. त्या शेतकऱ्याने अनेकदा मुख्यमंत्री आणि कृषि मंत्र्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अखेर वैफल्यग्रस्त होत त्याने आत्महत्या केली असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ही केवळ शेतकरी कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर सरकारने केलेली शेकडो शेतकऱ्यांचे हत्या असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याच्या आत्महत्येचे पातक हे राज्य सरकारवर आहे. त्यामुळे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा कोणावर दाखल करावा? त्याचा खुलासा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

आपल्या राज्यातील शेतकरी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करत आहेत. ते देखील असामान्य शेतकरी नाहीत तर ज्यांनी शेतीमध्ये अनेक बदल घडवण्याचा प्रयत्न केला. जलसिंचनाचे प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी आहेत. मात्र सरकार काहीच करत नाही, त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. याची सरकारला लाज वाटत नाही का? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

राज्यातील हे सरकार खोक्या, बोक्या आणि ठोक्याच्या मागे लागले हे बरोबर आहे. मात्र सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार? शेतकऱ्यांना दिलेली वचने कधी पूर्ण करणार? असे प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी आपला जाहीरनामा पुन्हा एकदा वाचावा, असे आव्हान देखील संजय राऊत यांनी दिले आहे.

 

Previous Post

महत्वाची बातमी : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर !

Next Post

शैक्षणिक, आर्थिक आणि शेतीविषयक काम करणाऱ्या लोकांना फायदेशीर संधी मिळतील.

Next Post
जुन्या समस्येपासून या लोकांना आज मिळणार आराम !

शैक्षणिक, आर्थिक आणि शेतीविषयक काम करणाऱ्या लोकांना फायदेशीर संधी मिळतील.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group