• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खोक्यासह बोक्याला देखील सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

editor desk by editor desk
March 14, 2025
in क्राईम, राजकारण, राज्य
0
खोक्यासह बोक्याला देखील सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीस !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात बाहेर येत असतांना आता खोक्या उर्फ सतीश भोसले याचे घर आज पाडण्यात आले. वन विभाग आणि शिरूर कासार पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. खोक्याने वन खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण करत घर बांधले होते, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, खोक्या असो, बोक्या असो, ठोक्या असो. कुणालाही सोडले जाणार नाही. सगळ्यांना ठोकणार, अशी एका वाक्यात त्यांनी प्रतिक्रिया दिली.

आज दिल्ली येथे वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटसाठी बेठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. दौऱ्यावर आहेत. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राला चालना देणे आणि त्याची जागतिक उपस्थिती वाढवणे हे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे. WAVES ही माध्यमे आणि मनोरंजन उद्योगातील सर्व क्षेत्रांचा समावेश करणारी पहिली जागतिक शिखर परिषद आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईबाबत प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली.

वेव्हसाठी मुंबईला होस्ट म्हणून निवडले आहे. महाराष्ट्राला होस्ट स्टेट म्हणून निवडले आहे. जगातील या क्षेत्रातील सर्वात मोठी समीट होणार आहे. ऑडिओ, व्हिज्युअल एन्टरटेन्मेन्ट या क्षेत्रातील जे व्हूज व्हू आहेत, ते सगळे या निमित्ताने मुंबईत येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याठिकाणी येणार आहेत. एक सीईओ राउंड टेबल देखील करणार आहेत. त्यामुळे एक प्रचंड मोठी संधी मुंबईला आणि महाराष्ट्राला मिळालेली आहे. क्रिएटीव्ह इकॉनॉमी ही सगळ्यात वेगाने वाढणारी इकॉनॉमी आहे. लवकरच भारत 50 बिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करतोय. म्हणून जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आपल्याला मिळणे, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. महाराष्ट्राला यासाठी निवडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

 

Previous Post

जळगाव : रेल्वे गेट तोडून ट्रकची थेट एक्सप्रेसला धडक !

Next Post

ब्रेकिंग : ‘खोक्या’च्या घरावर कारवाईचा बुलडोजर !

Next Post
ब्रेकिंग : ‘खोक्या’च्या घरावर कारवाईचा बुलडोजर !

ब्रेकिंग : ‘खोक्या’च्या घरावर कारवाईचा बुलडोजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group