• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा : उद्धव ठाकरेंनी दिले सरकारला आव्हान !

editor desk by editor desk
March 6, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा : उद्धव ठाकरेंनी दिले सरकारला आव्हान !

मुंबई : वृत्तसंस्था

इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस आहे, असे म्हटले आहे. यावर टीका करताना फडणवीस यांनी भैय्याजी जोशी देखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे, नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ६) दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या लोकांनी हिंदू- मुस्लिम असा वाद काढला नाही, तर आता मराठी- मराठी असा वाद काढलेला आहे. भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन काल बरळून गेले. त्यांना त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटक, तामिळनाडू, बंगालमध्ये जाऊन बोलून दाखवा, अशी भाषा केल्यानंतर तेथून सुखरूप परत येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

सगळे लोक छावा चित्रपटाला बघायला गेले नव्हते. काही अनाजी पंतही गेलेले नाहीत. अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसे काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवले आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत, असा टोला उपंमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावला.

भाजपला उत्तर विरुद्ध दक्षिण अशी देशाची विभागणी करायची आहे. भाजपला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे. भाजपमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जर मराठी भाषेबद्दल काही वाटत असेल, तर जोशी य़ांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचा स्पष्ट होईल. भाजपची आणि संघाची अशी प्रवृत्ती आहे की, त्या ठिकाणी पिल्लू सोडायचं आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचे, अशी टीका टाकरे यांनी यावेळी केली.

तुम्ही तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीचा कायदा केलेला आहे. सरकारला माझे सांगणे आहे की, मुंबई निर्मितीसाठी २८० लोकांनी बलिदान करून मुंबई मराठी माणसाला मिळवून दिलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येऊन तुम्ही साखरेचा खडा देऊ शकत नसाल, तर निदान मिठाचा खडा टाकू नका. आम्ही हे बोलून शांत बसणार नाही, तर आम्ही हुतात्मा चौकात जाऊन सर्व हुतात्म्यांना नमन करणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

Previous Post

चोरट्यांचा शेतात धुमाकूळ : दोन अटकेत !

Next Post

बॅटने अमानुष मारहाण करणारा आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !

Next Post
बॅटने अमानुष मारहाण करणारा आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !

बॅटने अमानुष मारहाण करणारा आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

यावल शहरात अपघाताचा थरार : कंटेनरच्या धडकेत महिलेचा दुर्देवी मृत्यू !

June 29, 2025
४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

४८ वर्षीय शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय !

June 29, 2025
४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group