• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ठाकरे गटात ‘हम दो हमारे दो’च उरले ; शिंदेंच्या नेत्यांनी डागळली तोफ !

editor desk by editor desk
March 3, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
“राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी मागे घ्या!”

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी अनेकांची रीघ लागली असून ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसत आहे. नुकतेच आता शिंदेंच्या मंत्र्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले कि, आमच्याकडे गँग आहे, ठाकरे सेनेला राज्यात गळती लागली आहे. त्यांच्याकडे केवळ ‘हम दो हमारे दो’च उरले आहेत. त्यामुळे त्यांचा अधिक विचार करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे असताना सामना सर्वत्र वाचला जायचा, आता रात्रीची न उतरलेले लोक त्यात लिहितात त्यामुळे त्याचे महत्त्व संपले आहे. हे भारतीय जासूस मनघडन कहानिया सामनात लिहितात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला.

जागतिक धम्म परिषदेनिमित्त ते नाशिकमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. मंत्री शिरसाट म्हणाले, सूर्यवंशी कुटुंबाला संपूर्ण सरकारचा पाठिंबा आहे. अवघ्या ८० दिवसांत आरोपपत्र कोर्टात सादर करण्यात आले आहे. बीड, परभणी पोलिस या प्रकरणी वेगाने काम करीत आहेत. पुण्यातील स्वारगेट महिला अत्याचारप्रकरणी, महायुती सरकारच्या काळात मंत्र्यांच्या मुलींना जो न्याय तोच सर्वसामान्यांच्या मुलींनाही न्याय असल्याने याप्रकरणी राजकारण करणे योग्य नाही. अत्याचार करणार्‍यांना भररस्त्यात फोडले पाहिजे हीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिवेशनात विरोधकांकडे बोलण्यासारखे काहीच उरले नाही, त्यामुळे ते मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचे नाव घेऊन सभात्याग करू शकतात, असेही ते म्हणाले. मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही केली. याबाबत विचारले असता, आठवलेंची ही मागणी भाजपकडे आहे, भाजपने त्याचा विचार करावा, असे शेवटी त्यांनी सांगितले. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, पालकमंत्रिपदाचा तिढा अधिवेशनात सुटेल. कुणी कितीही बॅनरबाजी केली तरी अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असणार आहे. त्यामुळे हा निर्णय अधिवेशनातच होईल. लवकरच त्याबाबत घोषणा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Previous Post

स्वारगेट प्रकरणातील आरोपी व्हिडीओ काढून महिलांचे करायचा ब्लॅकमेल !

Next Post

कठोर कायदा करून त्यांना तात्काळ जेल बंद करा : आ.मिटकरी !

Next Post
कठोर कायदा करून त्यांना तात्काळ जेल बंद करा : आ.मिटकरी !

कठोर कायदा करून त्यांना तात्काळ जेल बंद करा : आ.मिटकरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला एकनाथराव खडसे व गुलाबराव देवकरांची उपस्थिती

June 20, 2025
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
जळगाव

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

June 20, 2025
लोकलमध्ये पुन्हा महिलांमध्ये तुफान हाणामारी !
क्राईम

लोकलमध्ये पुन्हा महिलांमध्ये तुफान हाणामारी !

June 20, 2025
चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा !
क्राईम

चोपडा तालुक्यातील दुर्गम भागातील विनापरवाना कृषि सेवा केंद्रावर छापा !

June 20, 2025
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव
राजकारण

देशात सोन्यासह चांदीचे दर वाढले !

June 20, 2025
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !
राजकारण

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आधीच चर्चा झाली ; मंत्री देसाई !

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group