• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

भरधाव बसची रिक्षाला जबर धडक : महिलेचा दुर्देवी मृत्यू

editor desk by editor desk
February 26, 2025
in क्राईम, जळगाव
0
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगाव : प्रतिनिधी

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये लोहारा येथून येत असलेल्या रिक्षाला कुसुंबाजवळ खाजगी बसने दिलेल्या धडकेत रिक्षातील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी ७वाजता घडली. यात दोन जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, रत्नाबाई गणेश हिवाये (४०, रा. लोहारा, पाचोरा) असे मयत महिलेचे नाव आहे. रत्नाबाई या लोहारा येथे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होत्या. जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील लिलावातून भाजीपाला खरेदी करून, त्या लोहारा येथे घेऊन जायच्या. मंगळवारी त्या गावातील रिक्षातून जळगाव बाजार समितीकडे येत होत्या. कुसुंबा गावाच्या पुढे एका ट्रॅव्हल्सने रिक्षाला दिलेल्या धडकेत रिक्षा उलटून महिला ठार झाली.

लोहारा येथील रिक्षाला धडक बसल्यानंतर अपघाताच्या वेळेस लोहारा येथील युवक मोटारसायकलने जळगावला येत होते. गावातीलच रिक्षाचा अपघात झाल्यामुळे त्यांनी लागलीच गावात ही माहिती कळविली, तसेच जखमींना त्वरित उपचारासाठी जळगावला पाठविले. या अपघातात मयत असलेल्या रत्नाबाई हिवाये यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे.

अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक ट्रॅव्हल्स घेऊन पुढे निघून गेला. एमआयडीसी पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चालकाला सिंधी कॉलनीतून ट्रॅव्हल्ससह ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणी रिक्षा चालक बापू चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याच रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत कुसुंबा येथील पुजाऱ्याचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरात अवघ्या १२ तासांत दुसरा अपघात झाला. धडकेनंतर रिक्षातून रत्नाबाई या थेट रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलकावर जाऊन आदळल्या. त्यात त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षाचालक बापू भास्कर चौधरी (३०, रा.लोहारा) व गणेश बाबूलाल जाधव (२८, रा. रोटवद तांडा) हे जखमी झाले. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

आज तुम्ही तुमच्या कोणत्याही नकारात्मक गोष्टी सोडून देण्याचा संकल्प करा !

Next Post

जळगावात दुकानाला लागलेली आग तब्बल दोन तासांनी विझली !

Next Post
जळगावात दुकानाला लागलेली आग तब्बल दोन तासांनी विझली !

जळगावात दुकानाला लागलेली आग तब्बल दोन तासांनी विझली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
राजकारण

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

July 20, 2025
नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !
राजकारण

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !

July 20, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

धक्कादायक : विषप्राशन केलेल्या परसाडे येथील प्रौढाचा मृत्यू !

July 20, 2025
जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

July 20, 2025
नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!
क्राईम

नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

July 20, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

July 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp