Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उमर्टी प्रकरणी एकाला अटक तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
    क्राईम

    उमर्टी प्रकरणी एकाला अटक तर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskFebruary 17, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : प्रतिनिधी

    आरोपीस अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मारहाण करून जमावाने हवेत गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार केला. मारहाणीत पोलिस अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत. ही थरारक घटना पार उमर्टी ता. वरला येथे शनिवारी रात्री घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, जमावाशी झालेल्या झटापटीत सहायक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हेकॉ. शशिकांत पारधी, किरण पारधी आणि होमगार्ड विश्वास भिल्ल हे जखमी झाले आहेत. यापैकी शशिकांत पारधी यांचे जमावाने अपहरण केले होते. त्यांची नंतर सटका करण्यात आली. रात्री उशिरा पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला (३०), राजेंद्रसिंग • प्रीतमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला, गुरुदेवसिंग लिवरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला व इतर (रा. पार उमर्टी ता. वरला, जि. बडवाणी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पप्पीसिंग याला रात्रीच अटक करण्यात आली होती.

    पोलिस पथक पार उमर्टी येथे पोहचले त्यावेळी संशयित पप्पीसिंग हा • पोलिसांना पाहून पळाला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. त्याने आरडाओरड केल्याने काही जण जमा झाले. त्यांनी पोलिस पथकावर हल्ला करून मारहाण करण्यास सुरुवात केली.  जमावातील एकाने हवेत गोळीबार केला. त्याचवेळी सपोनि नितनवरे हे तिथे 3 पोहचले. त्यांनाही जमावाने मारहाण केली. जमाव ऐकत नसल्याचे पाहून त्यांनीही हवेत गोळीबार केला. जमावाने सपोनि नितनवरे यांना चारीत फेकून दिले, तसेच यातील पोलिस नाईक शशिकांत पारधी यांना एका मोटारसायकलवर बसवून अपहरण केले. यानंतर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे चोपड्यात पोहचले. त्यांनी वरला पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणी केली. यानंतर कॉ. पारधी यांची सुटका करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.