• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दारू न मिळाल्याने बापाने पोटच्या दोन लेकरांना नदीत फेकून केले ठार

editor desk by editor desk
February 5, 2025
in क्राईम, धुळे, राज्य
0
दारू न मिळाल्याने बापाने पोटच्या दोन लेकरांना नदीत फेकून केले ठार

धुळे : वृत्तसंस्था

खान्देशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी नातेवाईक महिलेने पैसे दिले नाही, या रागातून नराधम बापाने आपल्या पोटच्या दोन लेकरांना तापी नदीच्या पाण्यात फेकून ठार मारल्याचा खळबळ जनक प्रकार धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे घडला आहे. या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील कुंभार टेक भागात सुनील नारायण कोळी हे राहतात. त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. या कारणामुळे छायाबाई संजय कोळी आणि त्यांच्यात नेहमी वाद होण्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान दारू पिण्यासाठी त्यांनी नातेवाईक असलेल्या छायाबाई कोळी यांच्याकडून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सुनील कोळी यांनी मुलगा कार्तिक सुनील कोळी (वय पाच वर्ष )आणि मुलगी चेतना सुनील कोळी ( वय तीन वर्ष ) या दोघांना सोबत घेतले. रागाच्या भरात त्यांनी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात या दोन्ही मुलांना फेकून दिले. यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. ही बाब निदर्शनास आल्याने काही लोकांनी तातडीने हालचाली करीत दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मयत मुलांना शिरपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर छायाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुनील कोळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान थाळनेर पोलिसांनी फरार झालेल्या सुनील कोळी याला अटक करण्यासाठी पथक तयार केले असून त्याचा धुळे जिल्ह्यातील संशयित ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मद्यपी बापाने आपल्या मुलांचा खून केल्याच्या या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

 

Previous Post

पीएम मोदींनी केले गंगापूजन : देशवासीयांच्या सुख, समृद्धीसाठी प्रार्थना !

Next Post

या राशीतील लोकांनी प्रवास करणे टाळावे !

Next Post
या राशीतील लोकांनी प्रवास करणे टाळावे !

या राशीतील लोकांनी प्रवास करणे टाळावे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group