Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दारू न मिळाल्याने बापाने पोटच्या दोन लेकरांना नदीत फेकून केले ठार
    क्राईम

    दारू न मिळाल्याने बापाने पोटच्या दोन लेकरांना नदीत फेकून केले ठार

    editor deskBy editor deskFebruary 5, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धुळे : वृत्तसंस्था

    खान्देशात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दारू पिण्यासाठी नातेवाईक महिलेने पैसे दिले नाही, या रागातून नराधम बापाने आपल्या पोटच्या दोन लेकरांना तापी नदीच्या पाण्यात फेकून ठार मारल्याचा खळबळ जनक प्रकार धुळे जिल्ह्यातील थाळनेर येथे घडला आहे. या प्रकरणात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, थाळनेर येथील कुंभार टेक भागात सुनील नारायण कोळी हे राहतात. त्यांना दारू पिण्याचे व्यसन आहे. या कारणामुळे छायाबाई संजय कोळी आणि त्यांच्यात नेहमी वाद होण्याच्या घटना घडत होत्या. दरम्यान दारू पिण्यासाठी त्यांनी नातेवाईक असलेल्या छायाबाई कोळी यांच्याकडून पैशांची मागणी केली. मात्र त्यांना पैसे देण्यास नकार दिल्यामुळे सुनील कोळी यांनी मुलगा कार्तिक सुनील कोळी (वय पाच वर्ष )आणि मुलगी चेतना सुनील कोळी ( वय तीन वर्ष ) या दोघांना सोबत घेतले. रागाच्या भरात त्यांनी गावाजवळ असलेल्या तापी नदी पात्रात या दोन्ही मुलांना फेकून दिले. यानंतर घटनास्थळावरून पलायन केले. ही बाब निदर्शनास आल्याने काही लोकांनी तातडीने हालचाली करीत दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

    दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मयत मुलांना शिरपूर येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले. तर छायाबाई यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सुनील कोळी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान थाळनेर पोलिसांनी फरार झालेल्या सुनील कोळी याला अटक करण्यासाठी पथक तयार केले असून त्याचा धुळे जिल्ह्यातील संशयित ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली आहे. मद्यपी बापाने आपल्या मुलांचा खून केल्याच्या या घटनेमुळे शिरपूर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    २२६ नगरपरिषद-३८ नगरपंचायतींसाठी आज मतदान; सकाळपासून मतदारांची गर्दी !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.