• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा… मनोज जरांगे पाटील आक्रमक !

editor desk by editor desk
February 3, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा… मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मराठा आरक्षणसाठी तीन तरुणांनी आत्महत्या केली होती. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. मला राज्यात कुणाची नाही, पण तुमची फार गरज आहे. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. एका टक्क्यावरून हुकले, तर हुकू द्या. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा, पण आपल्या आई-बापापासून लांब जाऊ नका. आपल्या आई-बापाला दुसरा कोणाचा आधार नाही, असेही ते म्हणाले.

मनोज जरांगे यांनी सरकारकडेही दोन दिवसांत मार्ग काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावर दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा आम्हाला आंदोलन अधिक तीव्र करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड, बदनापूर आणि सिल्लोड येथे मराठा समाजबांधवांनी आत्महत्या केली होती. यावरून मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली.

मनोज जरांगे म्हणाले, यावेळेस आरक्षण हुकले, हा तुमचा दोष नाही. तुमचे आई-वडील तुम्हाला कष्ट करून पैसे पुरवतात. नोकरी लागण्याचे तुम्ही स्वप्न बघितलेले असते. दुसरा कमी गुण असून नोकरीला लागला. पण तुम्हाला मार्क असून तुम्ही लागला नाहीत. तुमची भावना योग्य आहे. पण नाईलाज आहे. एक-दोन वर्ष उशिर होऊ द्या. काही फरक पडत नाहीत. तुम्ही कायमचे संपू नका.

मनोज जरांगे यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. तुम्हाला अजून किती बळी पाहिजेत? असा सवाल जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. वेगळ्या कारणासाठी दोन-चार जणांनी आत्महत्या केली, तर तुम्ही पुनवर्सन करतात. मराठा समाजाचे तरुण राजकारण नाही, तर भविष्य मागत आहेत. भविष्यासाठी हक्काचे आरक्षण मागत आहेत, तुम्ही ते देत नाहीत. तुम्ही माणुसकी शून्य झालात. तुम्ही मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, असे ते म्हणाले. संयम सुटला तर मला महाराष्ट्रात वेगळे आंदोलन करावे लागले, असा इशाराही मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. जातीच्या लेकरांपेक्षा आम्हाला मोठे काही नाही. तुम्हाला काही द्वेष, राग असेल, तर तो नंतर बघा. गोरगरिबांच्या लेकरांनी काय केले? असा सवालही त्यांनी केला.

 

Previous Post

दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली !

Next Post

शरद पवार गट आक्रमक : राज्यात आंदोलन करण्याचा दिला इशारा !

Next Post
शरद पवार गट आक्रमक : राज्यात आंदोलन करण्याचा दिला इशारा !

शरद पवार गट आक्रमक : राज्यात आंदोलन करण्याचा दिला इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group