• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्य सरकारने थोडं जमिनीवर यावे ; आ.पवारांचा हल्लाबोल !

editor desk by editor desk
January 27, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्य सरकारने थोडं जमिनीवर यावे ; आ.पवारांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती व महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी सरकारवर हल्लाबोल चढविला आहे. राज्य सरकारमधील गोंधळामुळे राज्यांमध्ये बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र अद्याप सुरु होऊ शकते नाही, असा आरोप आ.पवारांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक हजार कोटींचा फटका बसला असून शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिसकावला गेला असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडे जमिनीवर येऊन गंभीरता दाखवत तूर खरेदी सुरू करावी, अशी मागणी देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरील पोस्ट माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने या संदर्भातला निर्णय लवकर घ्यावा, अन्यथा राज्यातील शेतकरी सरकारला भरडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. राज्य सरकारच्या चुकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी भरडला गेला असल्याची टीका देखील आमदार रोहित पवार यांनी केली आहे

या संदर्भात आमदार रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, एकीकडे केंद्राने तुरीच्या मुक्त आयातीला मुदतवाढ दिल्याने तुरीचे दर हमीभावापेक्षा खाली कोसळले आहेत तर दुसरीकडे राज्य सरकारच्या गोंधळामुळे बहुतांश ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुद्धा सुरु होऊ शकलेली नाहीत, परिणामी राज्यातल्या शेतकऱ्यांना तब्बल 1000 कोटीचा फटका बसला असून पुन्हा एकदा ऐन मोक्यावर शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिसकावला जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी जसा भरडला गेला तशीच स्थिती तुरीच्या बाबतीत सुद्धा होताना दिसत आहे. त्यामुळे बहुमताच्या हवेत उडणाऱ्या राज्य सरकारने थोडं जमिनीवर येऊन किमान आता तरी थोडे गांभीर्य दाखवत तूर खरेदी सुरळीत करावी. अन्यथा या सरकारला शेतकरी भरडल्याशिवाय राहणार नाही.

Previous Post

उत्तराखंडमध्ये आजपासून लागला समान नागरी कायदा !

Next Post

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे त्रिवेणी संगमात प्रवित्र ‘कुंभस्नान’ !

Next Post
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे त्रिवेणी संगमात प्रवित्र ‘कुंभस्नान’ !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे त्रिवेणी संगमात प्रवित्र 'कुंभस्नान' !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group