• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सर्वसामान्यांना धक्का : लालपरीचे दर आजपासून वाढले !

editor desk by editor desk
January 24, 2025
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
सर्वसामान्यांना धक्का : लालपरीचे दर आजपासून वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लालपरीच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने हा निर्णय घेतल्यामुळे तिकीट दरात 14.97 टक्के वाढ होणार आहे. ही दरवाढ आजपासून (24 जानेवारी) लागू होईल. तसेच एसटीसोबत रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीलाही मान्यता दिली आहे. त्यामुळे दोन्ही वाहनांच्या दरात 3 रूपयांची वाढ होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. लालपरीचे भविष्य अंधांतरी होते. हे वाटत असताना दररोज तीन कोटी रूपयांचे नुकसान होत होते. ते दरवाढीमुळे कुठेतरी कमी होईल. प्राधिकरणाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यात लोकप्रतिनिधींचा समावेश नसतो.

गृह, परिवहन आणि अर्थ खात्याचे प्रधान सचिव बैठक आयोजित करतात. या बैठकीत एसटीची भाडेवाढ 14.97 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय झाला. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाड 3 रूपायांनी झाली आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

डिझेल, सीएनजीचे दर वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक वर्षी भाडेवाढ अपेक्षित असते. तीन चार वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्यानं एकत्रितपणे 14.97 टक्के भाडेवाढ आजपासून लागू होईल. भाडेवाढीमुळे सर्वसामान्य लोकांचे बजेट कोलमडणार आहे, हे मान्य आहे. पण, एसटी महामंडळाची स्थिती चांगली नाही. एसटीच्या उत्पन्नापेक्षा खर्च अधिक आहे. एसटीचे दिवसाला तीन कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे भाडेवाढ अपरिहार्य आहे. प्रवाशांना चांगली सेवा द्यायची असेल, तर या गोष्टीची भविष्यात गरज पडणार आहे. डिझेलचे दर वाढत आहेत. मेंटनन्सचा खर्च अधिक येतो. लाडक्या बहिणींना तिकीट दरात 50 टक्क्यांची सवलत दिली आहे. त्यामुळे एसटीचं उत्पन्न वाढलं आहे. 75 वर्षांवरील वृद्धांना शासनानं मदत करणे आवश्यक आहे. असे देखील सरनाईक म्हणाले.

Previous Post

ब्रेकिंग : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट ; ५ जण ठार !

Next Post

‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

Next Post
‘छावा’ सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

'छावा' सिनेमाच्या ट्रेलरवरून उठले वादंग : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !
जळगाव

रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण !

July 6, 2025
भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !
क्राईम

भरधाव बस नदीत कोसळली : दोन प्रवासी जागीच ठार !

July 6, 2025
धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !
क्राईम

धरणगाव : घरी अंत्यसंस्काराची तयारी झाली अन वृद्ध जिवंत परतला घरी !

July 6, 2025
‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !
क्राईम

‘त्या’ पुलाजवळ पुन्हा दोन अपघात ; दोन वाहने धडकली तर ट्रक थेट शेतात !

July 6, 2025
पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !
क्राईम

पाचोऱ्यात वाळू माफियांमधील भांडणावरून ‘आकाश’वर गोळीबार : दोन अटकेत !

July 6, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक : सेवापुस्तक भरण्यासाठी शरीरसुखाची मागणी !

July 6, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group