यावल : प्रतिनिधी
तडवी कॉलनीत नगरपालिकेचा जलकुंभ आहे. या जलकुंभात सुरक्षा रक्षक नेमलेला आहे. बुधवारी रात्री याच सुरक्षा रक्षकाने जलकुंभाच्या पाण्यात आक्षेपार्ह कृत्य केल्याचा संशय काहीजणांनी व्यक्त केला आणि नगरपालिकेकडे तक्रार केली. नगरपालिकेने तातडीने दखल घेत संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करून त्याला कामावरून कमी केले आणि जलकुंभातील पाणी फेकून जलकुंभ धुवून पुन्हा स्वच्छ करण्यात आला आहे. या जलकुंभात तब्बल तीन लाख लिटर शुद्ध पाणी होते. मोठ्या प्रमाणावर सोडल्या गेलेल्या पाण्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरातदेखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते.
सुरक्षा रक्षकानेच बुधवारी रात्री जलकुंभातील पाण्यात आक्षेपार्ह कृत्य केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. त्याची नगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे दादू धोत्रे हे रात्रीच जलकुंभावर गेले. या भागातील नागरिकांच्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. धोत्रे यांनी रात्रीच संपूर्ण जलकुंभातील पाणी सोडून जलकुंभ रिकामा केला व धुवून स्वच्छ केला. आता रात्री त्यात स्वच्छ पाणी भरण्यात येत असून, गुरुवारी त्यातून शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. जलकुंभाच्या सुरक्षा रक्षकानेच हा आक्षेपार्ह प्रकार केला. त्याची माहिती परिसरातील काही तरुणांना मिळाली