Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !
    lifestyle

    उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !

    editor deskBy editor deskJanuary 16, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा धुमाकूळ सुरु असतांना आता मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत नोंदवले जात आहे. तर मराठवाड्यामध्ये 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तापमानात अंदाजे दोन अंशांनी वाढ नोंदवली जाणार असून विदर्भात मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

    राज्यात मागील दोन दिवसापासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होताना नोंदवले जात आहे. त्यातच अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यातील शेतकरी धास्तावले होते. मात्र अद्याप तरी अवकाळी पावसाचा फटका राज्यातील कोणत्याच भागाला बसलेला नाही. मात्र, यादरम्यान नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले होते. पहाटे आणि संध्याकाळी हलका गार वारा आणि धुक्याची चादर याचा परिणाम मात्र राज्यातील नागरिकांना सहन करावा लागला.
    दरम्यान बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापामान हे दहा अंशांच्या वर गेले होते. तर कोकण किनारपट्टी परिसरामध्ये काही भागांमध्ये 20 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यात रत्नागिरी 21 अंश तर सिंधुदुर्गात 23 अंशापर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात देखील सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदवण्यात आली. मराठवाड्यात तापमानाचा पारा सोळा ते अठरा अंशावर येऊन थांबला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडणार नाही. ; मुख्यमंत्री फडणवीस !

    December 2, 2025

    बुलढाण्यात बोगस मतदानाचा आरोप; आमदारांच्या मुलाकडून पोलिसांना धमकी !

    December 2, 2025

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.