• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !

editor desk by editor desk
January 16, 2025
in lifestyle, राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
उत्तर महाराष्ट्रात तापमान वाढले : थंडीचा जोर झाला कमी !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यात थंडीचा धुमाकूळ सुरु असतांना आता मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत नोंदवले जात आहे. तर मराठवाड्यामध्ये 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तापमानात अंदाजे दोन अंशांनी वाढ नोंदवली जाणार असून विदर्भात मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

राज्यात मागील दोन दिवसापासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होताना नोंदवले जात आहे. त्यातच अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यातील शेतकरी धास्तावले होते. मात्र अद्याप तरी अवकाळी पावसाचा फटका राज्यातील कोणत्याच भागाला बसलेला नाही. मात्र, यादरम्यान नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले होते. पहाटे आणि संध्याकाळी हलका गार वारा आणि धुक्याची चादर याचा परिणाम मात्र राज्यातील नागरिकांना सहन करावा लागला.
दरम्यान बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापामान हे दहा अंशांच्या वर गेले होते. तर कोकण किनारपट्टी परिसरामध्ये काही भागांमध्ये 20 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यात रत्नागिरी 21 अंश तर सिंधुदुर्गात 23 अंशापर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात देखील सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदवण्यात आली. मराठवाड्यात तापमानाचा पारा सोळा ते अठरा अंशावर येऊन थांबला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे.

Previous Post

उद्धव ठाकरे गटाची टीका : ….हा धिंगाणा कायमचा संपणार नाही !

Next Post

जळगावात दुचाकीला भरधाव वाहनाने दिली धडक : वृद्ध जागीच ठार !

Next Post
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार

जळगावात दुचाकीला भरधाव वाहनाने दिली धडक : वृद्ध जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !
राजकारण

आधार कार्डबाबत केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय !

June 14, 2025
खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !
कृषी

खळबळजनक : संतापाच्या भरात शेतकऱ्याने आमदारांचे घर जाळण्याचा प्रयत्न !

June 14, 2025
मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !
कृषी

मोठी बातमी : बच्चू कडू यांची उपोषण स्थगित करण्याची घोषणा !

June 14, 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !
क्राईम

अहमदाबाद विमान दुर्घटनेत आत्तापर्यंत २७४ जणांचे मृतदेह हाती !

June 14, 2025
जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !
क्राईम

जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू !

June 14, 2025
विद्यार्थिनीला आधी मिठी मारली अन मग गोळी मारली !
क्राईम

हॉटेल मालकाला खंडणी मागत सोन्याची चैन केली लंपास !

June 14, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group