जळगाव : प्रतिनिधी
रेणुकानगर येथील कुटुंब अंत्ययात्रेनिमित्त बाहेरगावी गेल्यामुळे बंद असलेले घर फोडून, खासगी वाहनचालकाच्या घरातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीला आली. या संदर्भात गुरुवारी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र पुंडलिक पाटील (वय ४९, रा. रेणुकानगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. २३ ते २५ डिसेंबर दरम्यान ते शिरपूर तालुक्यातील घोडसगाव येथे अंत्ययात्रेसाठी गेले होते. बंद घर असताना अज्ञात चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाटातून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली – आहे. पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल गुलाब माळी करीत आहेत.