• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा ; नेत्याची सरकारवर टीकेची झोड

editor desk by editor desk
December 26, 2024
in राजकारण, राज्य
0
राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा ; नेत्याची सरकारवर टीकेची झोड

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने वाढत असतांना नुकतेच काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कल्याणमधील एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्येच्या प्रकरणावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. सद्यस्थितीत राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजलेत. जाग येण्यासाठी हे सरकार आणखी किती वाट पाहणार? असा संतप्त सवाल यांनी या प्रकरणी सरकारला केला आहे.

कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीच्या बलात्कारानंतर हत्या करण्यात आली आहे. त्यातच पुण्यातील राजगुरूनगर येथेही दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही घटना घडल्यामुळे विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील कायदा सु्व्यवस्थेवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, बदलापूर… आता कल्याण, पुणे ! जाग येण्यासाठी महायुती सरकार आणखी किती घटनांची वाट बघणार? कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपी विशाल गवळी याच्यावर यापूर्वीही अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना तो जामिनावर सुटला आणि पुन्हा एका बालिकेवर अत्याचार करून तिचा जीव घेतला. हे अत्यंत संतापजनक आहे. यामुळे राज्यातील पोलिस आणि कायदा यांचा गुन्हेगारांवर धाक उरला नसल्याचे स्पष्ट होते.

बदलापूर असो किंवा कल्याण, महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर महायुती सरकार किती गंभीर आहे, हे या घटनांमधून स्पष्ट होत आहे. राजगुरुनगर, पुणे येथे दोन निष्पाप बहिणींची हत्या हा देखील संतापजनक प्रकार आहे. खेळता – खेळता हरवलेल्या या मुलींच्या निर्घृण हत्येमुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. गुन्हेगार निर्भयपणे वावरत आहेत, हे या सरकारच्या अपयशाचे लक्षण आहे.

Previous Post

बागेश्वर धाम सरकारच्या दरबारात महिला चोरट्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

Next Post

व्यवसायात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार !

Next Post
आजचा दिवस या लोकांसाठी जाणार भरभराटीचा !

व्यवसायात तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group