जळगाव प्रतिनिधी । जागेच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये हाणामारी करून दोन्ही कुटुंबातील दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी परस्पर विरोधात तीन जणांवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जळगाव शहरातील एका भागात दोन कुटुंबिय एकाच भागात राहतात. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जागेच्या वादातून दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली आहे. दोन कुटुंबियांमध्ये झालेल्या वादात दोन महिलांचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. एकामेकांनी जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी दोन्ही कुटुंबियांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता धाव घेवून एकमेकांविरूध्द तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात तीन जणांविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ हरीलाल पाटील करीत आहे.