Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मक्याने भरलेली ट्रॉली उलटली ; मक्याचे मोठे नुकसान
    कृषी

    मक्याने भरलेली ट्रॉली उलटली ; मक्याचे मोठे नुकसान

    editor deskBy editor deskDecember 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा कालव्यावरील पुलाचे काम अपूर्ण असून, या ठिकाणी मका घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली सोमवारी उलटली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, मक्याचे मोठे नुकसान झाले आहे.
    गुढे येथील म्हसोबा मंदिराजवळ असलेल्या जामदा डाव्या कालव्यावरील हा पूल १० ते १२ महिन्यांपासून पाडण्यात आला आहे. नवीन पुलाचे बांधकाम चाळीसगाव सा. बां. विभागाच्या देखरेखीखाली सुरू झाले असून, हे काम अद्यापही अपूर्णच आहे. त्यामुळे गुढे परिसरातील शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

    सोमवारी सायंकाळी ५ वाजता खेडगाव, ता. चाळीसगाव येथील शत्रुघ्न पिंजारी यांच्या शेतातील मका काढून वजन करण्यासाठी खेडगाववरून तीन ट्रॅक्टर बहाळ येथे घेऊन जात असताना त्यापैकी एक ट्रॉली या कालव्यावरील पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी उलटली. पाइप टाकून बनविलेल्या कच्च्या रस्त्यावरून जात असताना रस्ता खचल्यामुळे ही ट्रॉली थेट कालव्यात उलटली. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

    गढे येथील बहतेक शेतकरी हे लिंब ऊस उत्पादक असून, सध्या लिंबू माल ट्रॅक्टर, बैलगाडी तसेच दुचाकीने घरी आणत आहेत; परंतु, पाइप टाकून पर्यायी बनविलेल्या अरुंद कच्च्या पुलावरून प्रवास करताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून जावे लागते. कच्च्या पुलाच्या पलीकडे खेडगाव रस्त्यालगत गुढे येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली आहे. ऊस काढणीचा हंगाम सुरू झाला असून, ऊसतोड सुरू झाली आहे. तोडलेल्या पुलाच्या पलीकडे एरंडोल-येवला राज्यमार्ग आहे. मात्र, पुलाचे काम होत नसल्याने उसाचे भरलेले ट्रक, ट्रॅक्टर मोठ्या फेऱ्या मारून घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्याचा आणि ऊस तोडणाऱ्या मुकादमाचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.