• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…

editor desk by editor desk
November 25, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असून यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. तर महाविकासाआघाडीचा दारुण पराभव झाला. विधानसभेच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मराठ्यांसाठी आता राजकारण हा विषय संपला आहे. मराठे आता पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत. आम्ही देशात कधीही झाले नाही, असे भव्य आणि मोठे सामूहिक उपोषण करणार आहोत, असे विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मनोज जरांगे पाटील यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महायुतीच्या मुख्यमंत्रिपदावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट भाष्य केले. “सत्ता, सत्ता असते, त्यावेळी मराठी नेत्यांना गुडघ्यावर टेकवले होते आणि आताही तेच सत्तेत आहेत, त्याचे आम्हाला काही वाटत नाही. मराठ्यांनी त्यांना पाच वर्षे हाताळलं आहे, त्यामुळे आता हाताळणे काही अवघड नाही. त्यामुळे कोणीही मुख्यमंत्री झाले काय..? नाही झाले काय.? आम्हाला त्याबद्दल कोणतेही सोयर सुतक नाही”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्ही मात्र आरक्षणासाठी प्रचंड मोठा लढा करणार आहोत. देशात कधीही झाले नसेल असे भव्य आणि मोठे सामूहिक आमरण उपोषण करणार आहोत. मराठे पुन्हा एकदा कडवी झुंज देणार आहेत, आता राजकारण विषय संपला आहे. ज्याला निवडून आणायचे त्याला आणले आहे आणि ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण आहे. मराठ्यांना जे सांगितले होते ते त्यांनी केले आहे, आता त्यांच्या लेकरांचा प्रश्न आहे”, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

“मराठे आता सामूहिक उपोषणाच्या तयारीला लागले आहेत आणि ते जिंकणार आहेत. निवडून येणाऱ्यांनी आनंदात हुरळून जायचे नसते आणि पडणाऱ्यांनी जास्त खचायचे नसते. निवडून आलेले आणि पडणारे दोघांनीही मराठा समाजासाठी सक्रिय झाले पाहिजे. निवडून आलेले आणि पडलेले या दोघांचीही जबाबदारी आहे. लोकांमध्ये राहले नाही तर पुढच्या पाच वर्षांत या दोघांनाही लोक टिपऱ्याने हाणतील. मराठ्यांनी पडलेले आणि निवडून आलेल्या दोघांनाही मतदान केलेले आहे. त्यांनी मराठ्यांच्या प्रश्नासाठी लगेच बाहेर पडले पाहिजे आणि बाहेर पडले नाहीतर लोक तुम्हाला चपलेने हाणतील”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

Previous Post

धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

Next Post

राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजितदादा…दादा गटाने पवार गटाला डिवचले

Next Post
राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजितदादा…दादा गटाने पवार गटाला डिवचले

राष्ट्रवादीचा खरा वारसदार अजितदादा...दादा गटाने पवार गटाला डिवचले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group