Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता; जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
    क्राईम

    दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात चौघांची निर्दोष मुक्तता; जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 30, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : चाळीसगाव येथील भोसर येथे मारहाणी प्रकरणात चाळीसगाव न्यायालयाने चौघांना दिलेली तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुंबे यांनी रविवारी ३० जानेवारी रोजी दुपारी रद्द करून चौघांची निर्दोष मुक्तता केली आहे.

    सविस्तर हकीकत अशी की, चाळीसगाव तालुक्यातील भोसर येथील लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप या चौघांनी २६ मार्च २०११ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर त्यांच्या घरासमोर शौचालयासाठी खड्डा खणत असतांना त्यांना शेजारी राहणारे एकनाथ मालजी पाटील व त्यांची मुले नरेंद्र एकनाथ पाटील, संदीप एकनाथ पाटील व प्रमिलाबाई यांनी विरोधात केला. यावेळी लखन जगताप, आनंद जगताप, गणेश जगताप आणि रावसाहेब जगताप यांनी एकनाथ पाटील यांच्यासह त्यांच्या मुलांना व पत्नीला लोखंड रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली अशी फिर्याद एकनाथ पाटील यांनी चाळीसगाव तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    सदर गुन्ह्याच्या चौकशीकामी एकुण अकरा सरकारी साक्षीदार तपासण्यात आले. अंतिम चौकशीनंतर चाळीसगाव न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी लखन रावसाहेब जगताप, आनंद परमेश्वर जगताप, गणेश भगवान जगताप आणि रावसाहेब धना जगताप यांना प्रत्येकी तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. त्या शिक्षेच्या निकालाविरोधात चारही आरोपींनी जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. या खटल्यात अंतिम सुनावणीत रविवारी ३० जानेवारी रेाजी दुपारी २ वाजता जळगाव येथील तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जी ठुबे यांनी चाळीसगाव न्यायालयाने चौघां आरोपींविरुद्ध दिलेला प्रत्यकी तीन वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेचा निकाल रद्द केला करून चौघांची निर्दोष मुक्ताता केली आहे. चौघांतर्फे ॲड. वसंत ढाके यांनी काम पाहिले. यासाठी ॲड. प्रसाद ढाके, ॲड. निरंजन ढाके व ॲड. भारती ढाके यांनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.