• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंच्या मागणीवर शरद पवारांचे मोठे विधान ; १९७७ चे दिले उदाहरण !

editor desk by editor desk
September 4, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
उद्धव ठाकरेंच्या मागणीवर शरद पवारांचे मोठे विधान ; १९७७ चे दिले उदाहरण !

कोल्हापूर : वृत्तसंस्था

राज्यातील महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसापासून मतभेद असतांना नेहमीच दिसून येत असतांना पुन्हा एकदा आता शरद पवारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी थोकारली आहे. मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत अद्याप विचार करण्याचे अजिबात कारण नाही. यापूर्वी अनेक वेळा असे घडले आहे की, नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा निर्णय हा निवडणुका झाल्यानंतर संख्येनुसार घ्यायचा असतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आज कशाचा काही पत्ता नाही. बहुमत मिळेल असे वातावरण आहे यात शंका नाही. मात्र, तरी देखील त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीने निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषीत करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, आधी काँग्रेस आणि आता शरद पवार यांनी देखील त्यांची ही मागणी ठोकारली आहे. त्यासाठी पवारांनी 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीचे देखील उदाहरण दिले. आणीबाणी नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीत देखील कोणालाही पुढे केलेले नव्हते. आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे जयप्रकाश नारायणण यांनी म्हटले होते. निवडणूक झाल्यानंतर मुरारजी देसाई यांचे नाव पुढे आले. तोपर्यंत त्यांच्या नावाची कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसून तिन्ही पक्ष राज्याला एक स्थिर सरकार देऊ, असे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे. ज्यांचे संख्याबळ जास्त, त्यांचा मुख्यमंत्री होईल, असे देखील त्यांनी सांगितले.

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करून निवडणुकीला सामोरे जात आहे. निवडणुकीनंतर भूमिका मांडून मुख्यमंत्री आमच्याच विचारांचा असला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. मग तो काँग्रेसचा करा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा करा, किंवा कोणालाही करा. प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. संघ जर भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा, असे म्हणत असेल तर तो त्यांचा विचार असल्याचे देखील शरद पवार यांनी म्हटले आहे.

Previous Post

मंत्री गडकरी यांनी दिला सल्ला : ……तर महाराजांचा पुतळा कोसळला नसता !

Next Post

मुख्यमंत्री शिंदे ॲक्टिव्ह मोडवर : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश

Next Post
मुख्यमंत्री शिंदे ॲक्टिव्ह मोडवर : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश

मुख्यमंत्री शिंदे ॲक्टिव्ह मोडवर : अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group