Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकऱ्याला शॉक लागून दुर्देवी मृत्यू
    क्राईम

    शेतकऱ्याला शॉक लागून दुर्देवी मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील वराड येथील शेतात गेलेल्या येथील बालू बाबूराव भिल (६०) या शेतकऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी घडली. बालू भिल हे सकाळी साडेआठ वाजता असता गेले होते. यानंतर त्यांची पत्नी सुनंदाबाई या डबा घेऊन शेतात शेतात पोहोचल्या असता बालू भिल हे विहिरीजवळ पडलेले आढळले. हे दृश्य पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. हा आवाज ऐकून जवळच असलेले विकास पाटील हे घटनास्थळी धावत आले. गावातून कपील पाटील यांचे वाहन बोलावून बालू यांना धरणगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

    बालू हे पाणी भरण्यासाठी शेतात गेले होते. तेथे बिघाड झाल्याने त्यांनी मोटारीची वायर तोंडामध्ये धरून तोडण्याचा प्रयत्न केला व तितक्यातच वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत बालू यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव जिल्ह्यात जमावबंदी लागू; 3 डिसेंबरपर्यंत कडक बंदोबस्त !

    December 2, 2025

    भरधाव विद्यार्थ्यांची बस दरीत कोसळली : 35 जखमी, 5 गंभीर !

    December 2, 2025

    वाळूमाफियांची दादागिरी वाढली : थेट तलाठ्याला केली जबर मारहाण !

    December 2, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.