• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उद्धव ठाकरे बसले पावसात ; राज्यात सुरु झाले आंदोलन !

editor desk by editor desk
August 24, 2024
in राजकारण, राज्य
0
उद्धव ठाकरे बसले पावसात ; राज्यात सुरु झाले आंदोलन !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बदलापूर अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच घटनांचा निषेध करण्यासाठी मविआकडून सरकारविरोधात आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता विरोधकांनीही महाराष्ट्र बंद मागे घेतला आहे. मात्र महाविकास आघाडीकडून राज्यभरात ठिकठिकाणी निषेध आंदोलन सुरू आहे.

शिवसेना मध्यवर्ती कार्यलयाबाहेर काळ्या फिती लावून आंदोलन सुरू आहे. यात उद्धव ठाकरेंकडून भर पावसात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर आंदोलनात आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

शरद पवार म्हणाले की, राज्यातील राज्यकर्ते प्रचंड असंवेदनशील आहेत. माझ्या परिसरात किंवा आसपास महिलेवर अत्याचार होत असेल तर त्यांच्या विरोधात आवाज उठवत महिलांचा आदर राखील. सुरक्षित शहरासाठी आम्ही प्रयत्न करू असे शरद पवारांनी म्हटले आहे. तर महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य आहे. त्यांच्या राज्यात अत्याचाराची घटना झाली तेव्हा त्यांनी चौरंग करण्याची शिक्षा दिली होती, असेही त्यांनी म्हटले.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना मदत करण्यासाठी आघाडीवर असतो त्यांच्या याचिकेवर कोर्टाने निर्णय दिला. यावेळी त्यांची प्रतिष्ठा काय, योगदान काय असा सवाल करत राऊतांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यावर निशाणा साधला आहे. हा काही राजकीय बंद नव्हता. पण हा बंद 100 टक्के यशस्वी झाला असता, याची सरकारला अडचण झाली असती, असा टोला राऊतांनी लगावला आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मानतो, ती आमची परंपरा आहे. पण यापुढे जर अशा घटना घडल्या तर त्याला कोर्ट आणि याचिकाकर्ते जबाबदार असेल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, आमचे हे संपूर्ण राज्यात निषेधाचं आंदोलन आहे. आम्ही बंद पुकारला होता पण तो रद्द केला असला तरी अनेक व्यापारी अनेक दुकानदारांनी बंद पाळला आहे. आम्ही सर्व मविआचे कार्यकर्ते काळ्या फिती लावून बसलो आहोत. हे काळ्या पायाचे सरकार आहे, असा टोला दानवेंनी छत्रपती संभाजीनगरात लगावला आहे.

 

Previous Post

सरकारने घातली ‘या’ औषधांवर बंदी

Next Post

स्टील कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट !

Next Post
स्टील कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट !

स्टील कंपनीत बॉयलरचा भीषण स्फोट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

खळबळजनक :वारीला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार !

June 30, 2025
पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !
राजकारण

पुन्हा एकदा जय महाराष्ट्रचा नारा बुलंद ; उद्धव ठाकरेंचा दावा !

June 30, 2025
आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !
राजकारण

आम्ही कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची फटकेबाजी !

June 30, 2025
राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…
राजकारण

राज ठाकरेंनी मानले जनतेचे आभार अन आता ५ रोजी…

June 30, 2025
हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group