Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी : 7 कावड धारकांचा मृत्यू
    क्राईम

    बिहारच्या सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी : 7 कावड धारकांचा मृत्यू

    editor deskBy editor deskAugust 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशातील अनेक राज्यात सध्या गंभीर घटना घडत असतांना नुकतेच श्रावणी जत्रेदरम्यान श्रावणीच्या चौथ्या सोमवारी बिहारच्या जेहानाबादमध्ये सिद्धेश्वरनाथ मंदिरात चेंगराचेंगरी झाली. यामध्ये 7 कावड धारकांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली आहे. तेथे बरेच लोक पडले होते.

    ही घटना रविवारी रात्री उशिरा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. लाठीचार्ज झाल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे. बराबर टेकडीवर भाविक एका बाजूने उतरत होते आणि दुसऱ्या बाजूने चढत होते. गोंधळ झाल्यावर बंदोबस्तात सहभागी असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी लाठीमार करण्यास सुरुवात केली. यामुळे चेंगराचेंगरी झाली, भाविक जीव वाचवण्यासाठी धावू लागले आणि चिरडले गेले.

    मृताचे नातेवाईक कृष्ण कुमार यांनी सांगितले की, ‘या घटनेत सुमारे 50 लोकांचा मृत्यू झाला आहे. दर्शनासाठी आलेले भाविक असे सांगत आहेत. रात्री 2 वाजल्यापासून लोक रुग्णालयात आहेत. प्रशासनाने योग्य ती व्यवस्था केलेली नाही. प्रशासनाकडेही वाहन असते तर लोकांचे प्राण वाचू शकले असते. निष्काळजीपणा झाला आहे. प्रत्येकी चार मृतदेह एका रुग्णवाहिकेतून पाठवले जात आहेत. काही मृतदेह बाहेर काढले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरू केले. जहानाबादच्या डीएम अलंकृता पांडे म्हणाल्या, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.

    दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या 7 जणांमध्ये गया जिल्ह्यातील मोर टेकरी येथील रहिवासी पूनम देवी, मखदुमपूर पोलिस स्टेशन हद्दीतील लदौआ गावातील निशा कुमारी, जल बिघा येथील नाडोल येथील सुशीला देवी, एरकी येथील निशा यांचा समावेश आहे. राजू कुमार आणि प्यारे पासवान या दोन पुरुषांचा समावेश आहे, तर एका महिलेची ओळख पटलेली नाही, पोलिस तिची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.