Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!
    राजकारण

    रस्त्याच्या कामासाठी प्रहारने भरपावसात खड्ड्यात मांडला ठिय्या!

    editor deskBy editor deskJuly 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    रावेर तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून पावसाळा सुरु झाल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पिंप्री-मंगरूळ रस्त्यावर भर पावसात आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी खड्ड्यात बसून आपल्या मागण्या मांडल्या. आंदोलनाची दखल घेत अधिकाऱ्यांना यावे लागले.

    रावेर तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यांची पुरेशी कामेच झालेली नाही. बहुतांश रस्त्यावर केवळ डागडुजी केली जात असल्याने पावसाळ्यात परिस्थिती जैसे थे होत असते. पिंप्री मंगरूळ रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून १-१ फुटाचे खड्डे पडले आहेत. रस्त्याने ये-जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः विद्यार्थी, महिला आणि शेतकरी वर्गाचे मोठे हाल होत आहे. वारंवार तक्रार करून देखील समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांना सांगितले होते.

    भर पावसात खड्ड्यात केले आंदोलन
    बुधवारी दुपारी भर पावसात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी नागरिकांनासोबत घेत थेट पिंप्री मंगरूळ रस्ता गाठला. पाऊस सुरू असताना देखील खड्ड्यात बसून त्यांनी आंदोलन पुकारले. काही आंदोलकांनी तर चिखलाच्या पाण्यात झोपा काढल्या. अधिकारी येणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने पावसात देखील आंदोलन चांगलेच पेटले.

    अधिकाऱ्यांनाही घ्यावी लागली दखल
    आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अधिकारी त्याठिकाणी पोहचले. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना देखील अनिल चौधरी यांनी जनतेचे हाल जाणून घेण्यासाठी पाण्यात बसवले. अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी बोलणे करून दिले असता लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरु करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रस्त्याचे काम मार्गी लागल्यास केऱ्हाळा, अहिरवाडी, खानापूर, पिंप्री, मंगरूळ गावातील नागरिकांना फायदा होणार आहे.

    आंदोलनात यांचा होता सहभाग
    पिंप्री-मंगरूळ रस्त्याच्या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रावेर प्रहार तालुकाध्यक्ष भरत लिधुरे, उपसरपंच राकेश भंगाळे, संतोष बारी, रावेर युवक तालुकाध्यक्ष योगेश निकम, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष वासिम शेख सचिन महाजन, योगेश पाटील, कृष्णा महाजन, राहुल महाजन, माजी उपसरपंच विकास पाटील आदींसह परिसरातील शेतकरी बांधव आणि नागरिकांनी सहभाग घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाविकास आघाडी फुटली : कॉँग्रेस लढणार स्वबळावर !

    November 16, 2025

    ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई आमचीच : ठाकरेंच्या विधानाने चर्चेला उधान !

    November 15, 2025

    “जो जीता वही सिकंदर : फडणवीसांचा शरद पवारांना करारा टोला !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.