• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाच दिवस बरसणार पाऊस !

editor desk by editor desk
July 31, 2024
in राज्य, राष्ट्रीय
0
राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाच दिवस बरसणार पाऊस !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील पुढील ५ दिवसांत पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी १ ते ३ ऑगस्ट दरम्यान आणि कोकण आणि गोव्यात २ ते ३ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. कोकण आणि गोव्यातील काही ठिकाणी ३१ जुलै, १ ऑगस्ट आणि ४ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

मध्य महाराष्ट्रात ३१ जुलै आणि ३ ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या मान्सून ट्रफ सक्रिय आहे आणि ट्रफ समुद्रसपाटीवर त्याच्या सामान्य स्थितीच्या जवळपास आहे. पुढील ३ दिवसांत तो त्याच्या सामान्य स्थितीजवळ कायम राहण्याची आणि त्यानंतर हळूहळू दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वाऱ्यासह (३०-४० किमी प्रतितास वेग) मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

ठाणे, पालघरसाठी ३ ऑगस्ट रोजी तर रायगड आणि रत्नागिरीसाठी पुढील ३ ते ४ दिवस मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्गला ३१ जुलै, २ ते ३ ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट दिला आहे. नाशिकला ३ ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यात ३१ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याला १ ते २ ऑगस्ट दरम्यान ऑरेंज अलर्ट राहील. चंद्रपूरमध्ये १ ऑगस्ट, गडचिरोलीत ३१ आणि १ ऑगस्ट, गोदिंयात १ ऑगस्ट आणि वर्धा जिल्ह्याला २ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

Previous Post

मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांचा एक निर्णय अन भाजपमध्ये पसरली अस्वस्थता

Next Post

केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता : निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा !

Next Post
केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता : निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा !

केंद्रीय जल आयोगाने दिली मान्यता : निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !
क्राईम

४८ वर्षीय महिलेच्या खून प्रकरणी संशयित ताब्यात !

June 29, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दुकानाजवळ येऊन टोळक्याने केली एकाला जबर मारहाण !

June 29, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

गॅस सिलिंडरचा बेकायदेशीररित्या घरात साठा : पोलिसात गुन्हा दाखल !

June 29, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

जुन्या वादातून तिघांनी केली दोघांना जबर मारहाण !

June 29, 2025
दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड
जळगाव

दिशा स्पधी परीक्षा केंद्राचे मार्गदर्शक पाटील यांची लिपिकपदी निवड

June 29, 2025
या राशींना उत्तम असे नवीन वर्ष !
राशीभविष्य

या राशीतील लोकांना आज पैसे खर्च करूनही तुम्हाला शांतता मिळणार नाही.

June 29, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group