• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर : सरकारवर साधला निशाणा !

editor desk by editor desk
July 29, 2024
in राजकारण, राज्य
0
राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर : सरकारवर साधला निशाणा !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असल्याने पुणे शहराला देखील पावसाने चांगलेच झोडपले आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्याच्या दौऱ्यासाठी निघाले असतांना त्यांनी आज पुणे येथे पाहणी केली असता सत्ताधारयांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज ठाकरे म्हणाले कि, राज्याला दोन उपमुख्यमंत्री असले तरी लक्ष कुणाचेच नाही, अशी स्थिती असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. केवळ अधिकाऱ्यांचे निलंबन करून प्रश्न सुटणार नसल्याचेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे. महानगरपालिकेतील अधिकारी, राज्य सरकारमधील काही अधिकारी आणि बिल्डर हे सर्व मिळून दिसली जमीन की विक, असाच कार्यक्रम सध्या चालू आहे. पुणे शहर हे एक शहर राहिले नाही तर ते पाच शहरे झाली आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर परिस्थितीतील व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून केंद्र सरकार राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही. त्यामुळे सध्या राज्यातील महानगरपालिकांना नगरसेवक नाहीत. त्यामुळे जबाबदारी घेणार कोण? प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलणार कोण? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सध्या सुरू असलेला कारभार पाहता ही सर्व जबाबदारी प्रशासनाची असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

या राज्यात बाहेरून येणाऱ्या, परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना तुम्ही मोफत घरे वाटत आहात. आणि या राज्यात राहणारे नागरिक सध्या भिक मागत आहेत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. याला सरकार चालवणे म्हणतात का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्य म्हणून महाराष्ट्रावर कोणाचे लक्ष आहे की नाही? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. देशात प्रत्येक जण आपापल्या राज्याचा विचार करत आहे. मात्र, देशात महाराष्ट्राच्या विचार करणारे कोणी आहे का? असे देखील राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Previous Post

दंगा करताना हटकले अन हवालदारावर कोयत्याने वार

Next Post

तरुणांना महत्वाची बातमी : ३५ हजार पगाराची मिळणार रेल्वेत नोकरी !

Next Post
तरुणांना महत्वाची बातमी : ३५ हजार पगाराची मिळणार रेल्वेत नोकरी !

तरुणांना महत्वाची बातमी : ३५ हजार पगाराची मिळणार रेल्वेत नोकरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group