• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : ३०० शिवभक्त अडकले, पोलीस यंत्रणेने सुखरूप आणले बाहेर !

editor desk by editor desk
July 8, 2024
in राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी : ३०० शिवभक्त अडकले, पोलीस यंत्रणेने सुखरूप आणले बाहेर !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने अनेक ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी गेले आहे त्यातील रायगड परिसरात रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य तुफानी पावसाने शेकडो पर्यटकांना तातडीने काल गडावरून खाली यावे लागले. शासनाने दिलेल्या आगामी चार दिवसांमधील पावसाच्या इशारा संदर्भात येत्या 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर जाणारा पायरी मार्ग तसेच रोपवे बंद राहणार असल्याची माहिती महाड तालुका पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने व रायगड प्राधिकरणचे प्रमुख यांच्यामार्फत देण्यात आली आहे.

दरम्यान आज (सोमवार) सकाळी पायरी मार्ग बंद करण्यापूर्वी गडावर गेलेल्या 300 शिवभक्त पर्यटकांना पोलीस यंत्रणेद्वारे रोपवेच्या माध्यमातून सुरक्षित खाली उतरवण्यात आल्याची माहिती रोपवे प्रशासनामार्फत देण्यात आली आहे. सद्यस्थितीमध्ये किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर तसेच नाणे दरवाजा येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मार्ग शिवभक्त पर्यटकांसाठी बंद केला आहे. त्याचप्रमाणे रोपवे प्रशासनाने देखील आगामी 21 जुलै पर्यंत रोपवे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान काल रायगडवाडी येथील (40 वर्षीय) मनोज खोपकर हा इसम टकमक टोक परिसरात असलेल्या धबधब्यावरून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. त्याकरता एनडीआरएफचे पथक शोध मोहीम करीत असल्याचे सांगण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनामार्फत राज्यातील सर्व शिवभक्तांना 21 जुलै पर्यंत किल्ले रायगडवर पर्यटनासाठी येऊ नये असे सुचित करण्यात आले आहे. दरम्यान मागील 24 तासांमध्ये महाड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ येथे गोडाऊनची भिंत कोसळली असून अंशतः नुकसान झाले आहे. महाड नवे नगर येथे पिठाची गिरणीचे अंशतः नुकसान झाले आहे. नातोंडी येथील घरांचे अंशतः नुकसान व बिरवाडी भैरवनाथ नगर येथील दोन कुटुंबातील पाच व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आल्याची माहिती महाड तहसील कार्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी जाणून घेतल्या मुर्तिकारांच्या समस्या

Next Post

बापरे : रात्रीच्या सुमारास घरी जाताना तरुणाचा झाला मृत्यू !

Next Post
बापरे : रात्रीच्या सुमारास घरी जाताना तरुणाचा झाला मृत्यू !

बापरे : रात्रीच्या सुमारास घरी जाताना तरुणाचा झाला मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group