• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ओबीसी आंदोलनाला मोठे यश : बोलविणार बैठक !

editor desk by editor desk
June 27, 2024
in राजकारण, राज्य
0
ओबीसी आंदोलनाला मोठे यश : बोलविणार बैठक !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच आता ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसून आले आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाला शांत करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

या सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेते आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना आपल्या विविध मागण्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे मत ऐकल्यानंतर राज्य सरकार त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान देखील अशाच प्रकारची सर्वक्षीय बैठक राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आली होती.

राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ वडीगोद्री येथे त्यांच्या विरोधातच उपोषण सुरू केले होते. सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचसाठी या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे मानले जात आहे.

Previous Post

प्रेयसी व प्रियकरात भांडण : तब्येत बिघडल्याचा बनाव करीत घेतला प्रियकराने घेतला जीव

Next Post

फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र ; चर्चेला उधाण !

Next Post
फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र ; चर्चेला उधाण !

फडणवीस व उद्धव ठाकरे एकत्र ; चर्चेला उधाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group