Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ओबीसी आंदोलनाला मोठे यश : बोलविणार बैठक !
    राजकारण

    ओबीसी आंदोलनाला मोठे यश : बोलविणार बैठक !

    editor deskBy editor deskJune 27, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असतांना नुकतेच आता ओबीसी आंदोलनाला मोठे यश मिळताना दिसून आले आहे. मराठा समाजाचा सरसगट ओबीसीमध्ये समावेश करण्याच्या मागणीला ओबीसी समाजाच्या वतीने विरोध करण्यात येत आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्वा पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलनाला शांत करण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनादरम्यान 29 जून रोजी ओबीसी समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी ही सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीतील सर्वच पक्षांच्या भूमिकेकडे आता राज्यातील मराठा आणि ओबीसी समाजाचे लक्ष लागले आहे.

    या सर्वपक्षीय बैठकीसाठी सर्व पक्षांच्या प्रमुखांना बोलवण्यात आले आहे. तसेच राज्यातील ओबीसी नेते आणि प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना देखील आमंत्रित करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषण सोडताना आपल्या विविध मागण्या राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर ठेवल्या होत्या. त्या सर्व मागण्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांचे मत ऐकल्यानंतर राज्य सरकार त्यांची भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे मराठा आंदोलनादरम्यान देखील अशाच प्रकारची सर्वक्षीय बैठक राज्य सरकारच्या वतीने बोलावण्यात आली होती.

    राज्यात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट मनोज जरांगे उपोषण करत असलेल्या ठिकाणाच्या अगदी जवळ वडीगोद्री येथे त्यांच्या विरोधातच उपोषण सुरू केले होते. सरकारच्या वतीने आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार आता प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचसाठी या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रा. लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचे यश असल्याचे मानले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.