जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वावडदा येथील ग्रामसेवकांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी बुधवारी दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता काढले आहे. यामुळे जळगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पाठपुरावा उपसरपंच अनिल आत्माराम पाटील यांनी केला होता.
सविस्तर वृत्त असे कि, वावडदा येथील ग्रामसेवक मिलिंद घेणे, ग्रामसभेची नोंद न ठेवणे, मिठाराम बाऊस्कर यांनी पदावर कार्यरत असताना मासिक सभेची यांची कारवाई नोंद प्रोसिडिंग बुकात वेळेवर न पाणीपुरवठा योजनेची व ग्रामनिधीची रक्कम परस्पर खर्च करून अपहार करणे, पंधरावा वित्त आयोग अंतर्गत अपहार करणे, इत्यादीप्रमाणे अनियमतता केल्याचे चौकशीअंती दिसून आले आहे. त्याबाबतचा अहवाल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी दि. १६ मे २०२४ रोजी सादर केला होता. त्यानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रलंबित होती. त्यानुसार बुधवारी दि. २६ जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी ग्रामसेवक मिलिंद बावस्कर यांना ग्रामसेवक पदावरून निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. त्यानंतर त्यांना पंचायत समिती, चोपडा हे मुख्यालय देण्यात आले आहे, यामुळे जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.