• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

राज्यात पोलीस भरती अन गृहमंत्र्यांनी घेतला निर्णय !

editor desk by editor desk
June 21, 2024
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
राज्यात पोलीस भरती अन गृहमंत्र्यांनी घेतला निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक येत आहे तर दुसरीकडे राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत एकूण 17 हजार 471 पदांसाठी पोलिस भरती प्रकिया सुरू झाली आहे. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू असल्याने ज्या ठिकाणी पाऊस आहे त्या ठिकाणच्या मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, यापुढेही पावसाचे दिवस आहेत. त्यानंतर पुढे आचारसंहिता सुरु होईल. अशावेळी पोलिस भरतीची मैदानी चाचणी लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न राहील. कारण अनेक उमेदवारांसाठी ही शेवटची संधी असते. त्यांना ती संधी मिळायला हवी. यामुळे पाऊस असलेल्या ठिकाणी मैदानी चाचण्या पुढे ढकलण्यात आल्याचे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, राज्यातील काही ठिकाणी पोलिस भरती प्रक्रिया रद्द झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठे भाष्य केले आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी पाऊस आहे. तिथे चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. पाऊस पुढे वाढणार आहे, त्यानंतर आचारसंहिता लागेल. त्यामुळे चाचणी पुढे गेली आहे. मुलांचे वय निघून जाईल. त्यानंतर त्यांना दुसरी संधीही मिळत नाही. त्यात मुले घरी चालले आहेत. त्यांच्यासाठी फारशा व्यवस्था नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी मंगल कार्यालय व्यवस्था करायला सांगितले आहे’, असे त्यांनी जूनमध्ये पोलीस भरती घेण्यावर भाष्य केलं. इफेक्टिव्ह आणि इफिशियंट कामासाठी एक प्रकल्प तयार करत आहे. यात एक कंपनी सरकारने तयार केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कायदा आणि सुव्यवस्था करता, तसेच गुन्हा झाल्यास सोडवणे करता येणार आहे. त्याचे मॉड्युल तयार केले होते, त्याचे सादरीकरण आज झाले. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित केला जाईल.

फडणवीस म्हणाले की, आपण सर्वात आधुनिक सायबर केंद्र तयार केले आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. त्यामुळे देशात सर्वात सशक्त पोलिस दल आपले असेल.प्रकल्पामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारीची माहिती काढणे, सीसीटीव्ही तपासणी, नंबर प्लेट ओळखणारा कॅमेरा नसला तरी याच्या माध्यमातून शोधून काढू शकतो. काही महिने लागतात, ते काही मिनिटात शोधता येईल. वाहतूक नियोजनात फायदा होईल. या प्रकारचे मॉड्युल तयार करून सर्व युनिट्स इंटिग्रेड करणे सोपे होईल.

Previous Post

दुष्काळी अनुदानासाठी आंदोलन करणारे माजी खासदार – आमदार आहेत लाखाच्या अनुदानाचे धनी

Next Post

राजकीय चर्चेला उधान : गृहमंत्र्यांची आ.खडसेंनी घेतली भेट

Next Post
राजकीय चर्चेला उधान : गृहमंत्र्यांची आ.खडसेंनी घेतली भेट

राजकीय चर्चेला उधान : गृहमंत्र्यांची आ.खडसेंनी घेतली भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group