धरणगाव : प्रतिनिधी
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लग्नाच्या कार्यक्रमासाठी रिक्षाने प्रवास करत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पटली होवून ५० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतदेह जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी आक्रोश केल्याचे पहायला मिळाले. भिवसन खंडू कोळी वय ५० रा. पाळधी ता. धरणगाव असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे भिवसन कोळी हे आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे आज शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता रिक्षाने निघाले होते. धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पटली झाली. यात भिवसन कोळी हे दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी मयत घोषीत केले.