यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीत अंघोळीसाठी गेलेल्या जळगाव येथील दोन मुलांचा सोमवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. रोहन काशिनाथ श्रीखंडे (१७, रा. रामानंदनगर) आणि प्रथमेश शरद सोनवणे (१७, रा वाघनगर), अशी या मुलांची नावे आहेत.
सविस्तर वृत्त असे कि, हे दोघे जळगावहून दुपारी १ वाजता शिरागड येथे सप्तशृंगी देवीचे मंदिरात दर्शनासाठी आले होते. यानंतर ते समोरच असलेल्या तापी नदीत अंघोळीसाठी गेले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही जण बुडाले. काही जणांनी त्यांना बाहेर काढले. लागलीच यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पण तोवर त्यांचा मृत्यू झालेला होता. याप्रकरणी यावल पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे