नंदुरबार : वृत्तसंस्था
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलावरूल दोन तरुणांनी उडी घेतल्याने गावात विविध चर्चा सुरू आहेत. सारंगखेडा येथील तापी पुलावरून एकाच दिवशी दोन तरुणांनी नदी पात्रात उडी टाकत आपलं जीवन संपवलं आहे. दोन वेगवेगळ्या घटना आहेत मात्र एकाच जागेवरून या दोन तरुणांनी तापी नदी पुलावरून उडी टाकल्याने एकच खळबळ माजली आहे.
यावेळी घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस स्टेशनची पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनेची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केलेली होती. सारंगखेडा येथील तापी पूल आता सुसाईड पॉईंट झाल्याची चर्चा रंगू लागले आहे. हे दोन्ही तरुण कोण आहेत त्यांनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.