Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी गंभीर
    अमळनेर

    शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला; शेतकरी गंभीर

    editor deskBy editor deskApril 4, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भडगाव : प्रतिनिधी

    भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी शेतातील पिकांना पाणी भरत असताना त्यांच्यावर रानडुक्कराने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी चाळीसगावच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कजगावसह परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ३ रोजी तांदुळवाडी येथील शेतकरी रवींद्र सुपडु पाटील (वय ५०) हे सकाळी बाजरी, मका पिकांना पाणी भरण्यासाठी भोरटेक शिवारातील आपल्या शेतात गेले होते. पिकांना पाणी भरत असताना अचानक रानडुक्कराने पाटील यांच्यावर झडप घेत मांडीला चावा घेतला. मांडीला गंभीर इजा झाल्याने त्यांना तत्काळ चाळीसगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, पिकांची नासाडी करणाऱ्या रानडुक्कराने शेतकऱ्यांवर हल्ले चढवण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांसह मजूर धास्तावले आहेत.

    दरम्यान, कजगाव परिसरात रानडुकरांची संख्या वाढली आहे. तर ३ रोजी शेतकऱ्यावर रानडुक्कराने हल्ला केल्याने परिसरातील बळीराजा धास्तावला आहे.

    कजगाव परिसरातही रानडुक्करांनी कहर केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. हाता तोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी शेतकरी रात्र-दिवस पिकांचे रक्षण करण्यासाठी विविध युक्त्या अवलंबत आहेत. यात मोठ्या आवाजाचे फटाके फोडणे, डफ वाजवणे, स्पीकर द्वारे कुत्र्यांचा आवाज, ठासनीने फटाक्यांचा आवाज हा सारा सोपस्कार करून ही रानडुक्कर दिशा बदलवून पिकांची नासाडी करत असल्याने शेतकरी जेरीस आले आहेत. टाकळी रस्त्यावरील शेतशिवारात अनेकांचा मका फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच कमी पाण्यावर रात्रदिवस एक करत पिके वाचवण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. परंतु, डुकरांच्या उपद्रवामुळे ते हैराण झाले असून रानडुक्करांचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    छत्रपती चौकात भाजपची जंगी सभा; नगराध्यक्षपदासाठी प्रतिभा चव्हाण मैदानात

    November 17, 2025

    राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफीवर मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका !

    November 17, 2025

    संकट मोचकाच्या तथाकथित हनुमानाची भुसावळच्या विजुभाऊची सुपारी यावलमध्ये फेल

    November 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.