Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक: पत्नीने पतीचा खून केल्याची उकल वर्षभरानंतर !
    क्राईम

    धक्कादायक: पत्नीने पतीचा खून केल्याची उकल वर्षभरानंतर !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 27, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : व्यसनी पतीकडून सतत मारहाण व शिविगाळीने कंटाळून 46 वर्षीय विवाहितेने पतीचा खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरमध्ये ( हनुमान मंदिरामागे ) घडली. विशेष म्हणजे आरोपी पत्नीचं असल्याचे एका वर्षांनंतर पोलिसांनी निष्पन्न केले. या घटनेत गणेश प्रभाकर महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) यांचा मृत्यू झाला. आरोपी पत्नी सीमा महाजन (46, ) हिला पोलिसांनी अटक केली आहे.

    वर्षभरापूर्वी ही घटना घडली असली तरी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अकस्मात मृत्यूच्या अहवालाची बारकाईने तपासणी केल्यानंतर मयताची आत्महत्या नसून खून असल्याचा निष्कर्ष काढला होता बारकाईने झालेल्या पोलिस तपासानंतर मयताचा खून झाल्याची बाब स्पष्ट झाली. भाजीपाला विक्री करणारे गणेश महाजन (50, रा.लक्ष्मी नारायण नगर भुसावळ ) हे पत्नीला दारू पिवून सतत मारहाण व शिविगाळ करीत होते त्यामुळे या त्रासाला कंटाळून त्यांची पत्नी सीमा महाजन यांनी त्यांचा नायलॉन दोरीने गळा आवळला मात्र ही बाब पोलिसांपासून लपवून ठेवत गणेश महाजन यांनी आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनादेखील सुरूवातीला संशय न आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मात्र अभ्यासू डीवायएसपींकडे या गुन्ह्याची कागदपत्रे येताच त्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचे सांगत यंत्रणा कामाला लावली व खूनाचा गुन्हा उघड केला.

    भुसावळचे पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी वर्षभरात दोन खुनांची यशस्वीपणे उकल केली आहे. रावेर तालुक्यातील सुनोदा येथील रहिवाशी दीपक भगवान सपकाळे (24) या तरुणाचा घराशेजारील विवाहितेशी असलेल्या अनैतिक संबंधानानंतर खून करण्यात आला होता. आरोपींनी मृतदेह नशिराबाद रेल्वे रूळावर फेकला मात्र ज्या पद्धत्तीने तरुणाचा मृतदेह घटनास्थळी आढळला ती पद्धत पाहून हा खूनच असल्याचा निष्कर्ष वाघचौरे यांनी त्याचवेळी काढला. मयताच्या मोबाईलवर आलेला अखेरचा कॉल, मयताची घटनास्थळी आढळलेली दुचाकी व तांत्रिक विश्लेषणानंतर हा खून डिसेंबर 2020 मध्ये उघडकीस आला होता. या गुन्ह्यात 21 वर्षीय विवाहितेसह तिचा पती नितीन राजू धाडे (24, सुनोदा) व विवाहितेचा भाऊ हेमंत बाळू कोळी (21, रा.पाडळसा) व अन्य एका विधीसंघर्षग्रस्त बालकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सोनसाखळी चोरीचा उलगडा : रावेर गुन्हे शोध पथकाच्या सापळ्यात दोन सराईत चोर !

    December 4, 2025

    संतापजनक : सहा वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार : शाळेच्या सीसीटीव्हीट घटना कैद !

    December 4, 2025

    धक्कादायक : चार चिमुकल्यांचा खून एकाच पद्धतीने; आईच्या कबुलीनं थरकाप!

    December 4, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.