धरणगाव -अमृत 2.0 अंतर्गत धरणगाव शहरासाठी आपण वाढीव पाणी पुरवठा योजना सदर योजने अंतर्गत प्रस्तावित केली होती. शहरासाठी 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेचे. राज्य शासनाचे. राज्य स्तरीय तांत्रिक समिती कडे सादरीकरण करण्यात आले होते त्यास. मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
धरणगाव शहराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा वर्षाचे 365 दिवस व्हावा यासाठी पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री पाणी पुरवठा व स्वचछता गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नाने पाणी पुरवठा वितरण प्रणालीचे काम सुरू होते. लवकरच शहराला नियमित पाणी पुरवठा होणार होता.परंतु शहराचा पाण्याचा स्त्रोत तापी नदीवर धावडा येथून आहे, तेथील पाइप लाईन ही जुनी झाल्याने वारंवार लिकेज् होत असते. म्हणून शहराचा पाणी पुरवठा सतत खंडित होत होता.तेथील विहिरीत गाळ साचल्याने पण पाणी पुरवठा खंडित होत असतो.
वरील बाबी लक्षात घेऊन मंत्री पाटील यांनी विशेष लक्ष देऊन यावर उपाययोजना करण्याचे निर्देश नगरपालिका दिले होते. त्यानुसार आज केंद्र शासन कडील अमृत 2.0 योजने अंतर्गत धरणगाव शहरासाठी 44 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजनेचे. राज्य शासनाचे राज्य स्तरीय तांत्रिक समितीकडे सादरीकरण करण्यात आले होते त्यास. मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.