मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक वादंग घडत असतांना आता सर्वात मोठा दावा माजी खासदार शालिनीताई पाटील यांनी केल्याने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
शालिनी पाटील म्हणाले कि, “अजित पवार पुढच्या चार महिन्यांत तुरुंगात जातील”, तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, असं पाटील म्हणाल्या.
अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपाबरोबर गेल्याची चर्चा सातत्याने होत आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर शालिनीताई म्हणाल्या, तुरुंगात गेलेल्या माणसाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही. पुढच्या चार महिन्यांत अजित पवार तुरुंगात जातील. त्यामुळे ते मुख्यमंत्री होण्याची अजिबात शक्यता नाही. अजित पवार तुरुंगात गेल्यावर तिथे त्यांना भेटायलाही कोणी जाणार नाही. शालिनीताई पाटील मुंबई तकशी बोलत होत्या.