• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले संशयित ताब्यात

editor desk by editor desk
December 12, 2023
in क्राईम, जळगाव
0
पुतणीसोबत विवाहाला विरोध अन भावी नवरदेवाचा केला खून !

जळगाव : प्रतिनिधी 

जुना वाद उफाळून समतानगर परिसरात रविवारी झालेल्या अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समता नगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना वाद तसेच मयताचे पुतणीसोबत होणाऱ्या विवाहाला मारेकऱ्याचा असणारा विरोध यातून हा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समतानगर परिसरात रविवारी अरुण सोनवणे या तरुणाचा खून झाला. याप्रकरणी मयताचा भाऊ गोकुळ बळीराम सोनवणे याने रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, त्याचा चुलत भाऊ गणेश सोनवणे याच्यासोबत झालेला वाद मिटविण्यासाठी अरुण सोनवणे व त्याचा मित्र आशिष सोनवणे यांना सोनू आढाळे (रा. समतानगर) याने वंजारी टेकडी येथे बोलावले. तेथे गेल्यानंतर आढाळेसह पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड, योध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठ (पूर्ण नाव समजू शकले नाही) सर्व रा. समतानगर यांनी अरुणच्या शरीरावर चॉपरने सपासप वार करून गळा चिरून ठार मारले. तसेच, आशिष सोनवणे याच्यावरही चॉपरने वार करून जखमी केले. तेथे गोकुळ सोनवणे हा भांडण सोडविण्यासाठी गेला असता त्याच्यावरही वार करण्यात आल्याने तो जखमी झाला.

अरुण बळीराम सोनवणे (२८, रा. समतानगर) या तरुणाच्या खूनप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनू आढाळे (रा. समतानगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. खुनाच्या घटनेनंतर मारेकरी पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी एलसीबीचे तीन पथके तयार करून तपासकामी रवाना केले. सोनू आढाळे हा सुरतला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावरून एका पथकाने सोनूला विसरवाडीजवळून ताब्यात घेतले. अन्य तिघांचादेखील पथकाकडून शोध सुरू आहे.

सुरुवातीला जुन्या वादातून खून झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यासोबतच आता फिर्यादीत मयताच्या भावाने म्हटले आहे की, मारेकऱ्यांपैकी योध्या ऊर्फ पिंट्या शिरसाठच्या पुतणीसोबत होणाऱ्या अरुणच्या विवाहाला योध्याचा विरोध होता. त्यातून हा खून करण्यात आल्याचे मयताच्या भावाने म्हटले आहे. याप्रकरणी रविवारी रात्री वरील पाचही जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि विठ्ठल पाटील करीत आहेत.

 

Previous Post

एटीएममधील तीन बॅटरी चोरल्या !

Next Post

७ वर्षीय मुलीचा विनयभंग : ५७ वर्षीय वृद्ध अटकेत !

Next Post
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

७ वर्षीय मुलीचा विनयभंग : ५७ वर्षीय वृद्ध अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group