भंडारा : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने उघडकीस येत असतांना नुकतेच भंडारा जिल्ह्यात युवकाच्या खून प्रकरणी तिघांना पाेलीसांनी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून युवकाचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पाेलीस सखाेल तपास करीत आहेत.
पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास नयन मुकेश खोडके हा १९ वर्षीय युवक घरी न सांगता निघून गेला होता. ३० नोव्हेंबरला कोरंभी-सालेबर्डी नाल्यात संशयितरीत्या ताे मृतावस्थेत पाेलीसांना आढळला. या घटनेनंतर पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी विविध ठिकाणी तपासाची पथके फिरवली. त्यानंतर पाेलीसांनी एका दिवसातच संशयिताचा छडा लावला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समाेर आली आहे.
याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. मंथन अशोक ठाकरे (वय १९, राहणार भोजापूर), साहिल शरद धांडे (१९, राहणार ठाणा पेट्रोल पंप), पूनम नरेंद्र कारेमोरे (१९, राहणार बीड, सीतेपार) अशी संशयितांची नावे आहेत. या तिघांनीही संगनमत करून नयनला सालेबर्डी-कोरंभी मार्गाने नेले. घटनास्थळी नयनचे हातपाय बांधून गळफास लावला. त्यानंतर नयनला नाल्यात फेकून दिले. प्रेम प्रकरणातून नयनचा खून झाल्याची बाब समोर आली आहे अशी माहिती पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी दिली.