• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

editor desk by editor desk
October 12, 2023
in क्राईम
0
बिहारमध्ये रेल्वेचा अपघात : ४ प्रवासी ठार तर ५० जखमी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

 

बिहारच्या बक्सर जिल्ह्यात बुधवारी ११ ऑक्टोबर मध्यरात्रीच्या सुमारास रेल्वेचा भीषण अपघात झाला. दिल्लीहून गुवाहाटीला जाणाऱ्या नॉर्थ-इस्ट एक्सप्रेसचे २१ डब्बे रुळावरुन घसरले. या भयानक अपघातात ४ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर ७० प्रवासी गंभीर जखमी झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय. दरम्यान, या अपघाताबाबत लोको पायलटने एक खळबळजनक खुलासा केला आहे.

 

दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन रुळावरून घसरण्यापूर्वी लोको पायलटला एक मोठा आवाज आला. त्यामुळे लोको पायलटने अचानक ब्रेक दाबले. मात्र, काही कळण्याच्या आतच ट्रेनचे २१ डबे रुळावरुन घसरले. गेटमनने देखील या आवाजाची पुष्टी केली आहे. त्यामुळे हा अपघात होता की घातपात? असा संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे ट्रेनचे गार्ड विजय कुमार यांनी देखील थरकाप उडवणाऱ्या या घटनेबाबत माहिती सांगितली. विजय म्हणाले, ट्रेन सामान्य वेगाने धावत होती. मी बसून माझे काही पेपरवर्क करत होतो. तेवढ्यात अचानक मोठा आवाज झाला. लोको पायलटने ब्रेक लावताच ट्रेन रुळावरुन घसरली. त्यानंतर मोठा धक्का बसला. मी त्याच क्षणी बेशुद्ध झालो, असं विजय सांनी सांगितलं आहे. पाच मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर मी डोळ्यांवर पाणी शिंपडले. अपघाताच्या आधी झालेला आवाज कशाचा होता? लोको पायलटने अचानक ब्रेक का मारला ते कळलं नाही. असंही विजय कुमार यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत या दुर्घटनेत ४ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनही ७० प्रवासी जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी बिरेंद्र कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “घटनेचे कारण शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १०-१० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Tags: #accidentrailway
Previous Post

जिल्ह्यातील उद्योजकांना संधी : जळगावात एकदिवसीय कार्यशाळा !

Next Post

४० वर्षीय प्रशिक्षकाने केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार !

Next Post
४० वर्षीय प्रशिक्षकाने केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार !

४० वर्षीय प्रशिक्षकाने केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group