Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » झटपट पैसा : सहा आरोपींना रचला असा खेळ !
    क्राईम

    झटपट पैसा : सहा आरोपींना रचला असा खेळ !

    editor deskBy editor deskSeptember 30, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    गेल्या दोन वर्षापासून झटक्यात श्रीमंत होण्याचे अनेक लोक स्वप्न बघत असतात पण काही लोक याचमाध्यमातून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. ऑनलाइन माध्यमातून, तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या सहाय्याने लोकांशी संपर्क साधून त्यांना बोलण्यात गुंतवायचे. तसेच ठराविक काम केलेत तर किंवा ठराविक रक्कम गुंतवली तर तुम्हाला दुप्पट पैसे मिळतील, अशी लालूच दाखवत लोकांना लुबाडणारे अनेक गुन्हेगार सध्या कार्यरत आहेत.

    झटपट पैसा मिळवण्याच्या आमिषाने लोकही पुढचा मागचा विचार करत नाहीत आणि सरळ मेहनतीने कमावलेले पैसे गुंतवून बसतात. मात्र बऱ्याच जणांची यात फसवणूक होते आणि दुप्पट पैसे तर सोडाच गुंतवलेल्या मूळ रकमेवरही पाणी सोडावे लागते. सायबर क्राईमचे (cyber crime) असे अनेक गुन्हे सध्या घडताना दिसत आहेत.

    कर्नाटक पोलिसांनी देखील अशाच कोट्यवधींच्या सायबर फसणवुकीचा गुन्हा उघडकीस आणला. बंगळुरू येथे पोलिसांनी 854 कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून आरोपींनी देशभरातील हजारो लोकांची फसवणूक केली, त्यांचे पैसे लुटून त्यांना गंडा घातला असे पोलिसांनी सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी याबाबत माहिती दिली.

    फसवणुकीच्या एकूण रकमेपैकी ५ कोटी रुपये जप्त करण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून हे भामटे लोकांशी संपर् साधायचे आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढायचे. सुरूवातील ते लोकांना 1,000 ते 10,000 रुपयां पर्यंतची रक्कम गुंतवायला सांगायचे. हे पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला दररोज 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो, असे आमिष भामटे लोकांना दाखवायचे. जास्त पैसे मिळवण्याच्या हव्यासाने देशभरातील अनेक नागरिकांनी यामध्ये पैसे गुंतवले, काही लोकांनी तर एक लाख तर काही दहा लाखांपेक्षाही अधिक रक्कम गुंतवल्याची माहिती समोर आली आहे.

    भामट्यांच्या बोलण्यात गुंतून अनेक लोकांनी पैसे ट्रानस्फर करायचे. एकदा का पैसे खात्यात आले की आरोपी लगेचच ऑनलाइन माध्यमातून ते पैसे इतर बँकेच्या खात्यात वळवायचे. त्यानंतर गुंतवणूक केलेल्या लोकांनी पैसे काढायचा प्रयत्न केला पण त्यांना कोणताही रिफंड मिळाला नाही. अशा तऱ्हेने काही पैशांच्या मोबदल्यात अनेक लोकांनी त्यांची मेहनतीची कमाई गमावल्याचे समोर आले. एकदा संपूर्ण पैसे जमा झाल्यानंतर आरोपी मनी लाँड्रिंगशी संबंधित खात्यांवर पैसे पाठवायचे. आरोपींनी क्रिप्टो (बिनान्स), पेमेंट गेटवे, गेमिंग ॲप्स आणि इतर माध्यमातून एकूण 854 कोटी रुपयांची फसवणूक केली असे पोलिसांनी सांगितले.

    #crime #updates #jalgov #police Cyber crime Fraud Telegram
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.