जळगाव : प्रतिनिधी
विजेची वायर कट केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह दीराला मारहाण करुन धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील समता नगरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राणी सलीम शेख (वय ३०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घराची वीजेची वायर कट केल्याचे विद्यूत प्रवाह खंडीत झाला होत. त्यावेळी राणी शेख यांचा दीर तन्वीर शेख हा घराबाहेर आला. त्यावेळी संशयित अनवर शेखइब्राहिम शेख याच्यासह इतर दोन ते तीन जण बसलेले होते. तन्वीर शेख म्हणाला की, कुणीतरी विजेची वायर कट केली. असे बोलल्याचा राग आल्याने अनवर शेख इब्राहिम शेख याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यावेळी राणी सलीम शेख ह्या मध्यस्थी करण्यासाठी गेल्या असता त्यांना देखील मारहाण केली व चाकूसारख्या वस्तूने मारून हाताला दुखापत केली. दरम्यान महिलेने रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अनवर शेख इब्राहिम शेख रा. समता नगर, जळगाव याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ निलेश पाटील करीत आहेत.