Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ‘तू चपाती का बनवली नाहीस?’ लहान भावाने घेतला मोठ्या भावाचा जीव !
    क्राईम

    ‘तू चपाती का बनवली नाहीस?’ लहान भावाने घेतला मोठ्या भावाचा जीव !

    editor deskBy editor deskSeptember 12, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खा भाऊ वैरी झाल्याची हि घटना आहे एका चपातीवरुन झालेल्या वादात त्याने आपल्या मोठ्या भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचं कारण ठरली एक चपाती. आरोपीने फक्त मोठ्या भावाची हत्याच केली नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहासोबत जे केलं ते कळाल्यानंतर लोकांना धक्काच बसला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील बिल्हौर भागातील नानामाऊ गावात एका घरात दोन भाऊ एकाचे नाव कल्लू तर दुसऱ्याचे भुरा हे राहत होते. यात कल्लू हा मोठा भाऊ होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. भुरा विवाहित आहे. रक्षाबंधनाला त्याची पत्नी माहेरी गेली होती. तेव्हापासून ती परतलीच नव्हती. तीच पती आणि सासऱ्यासाठी जेवण बनवायची. त्याच्या अनुपस्थितीत दोन्ही भाऊ जेवण बनवायचे. शनिवारी भुरा कामानिमित्त घराबाहेर गेला होता. त्याने आपल्या मोठ्या भावाला तो येईपर्यंत चपाती बनवायला सांगितलं होतं. पण, रात्री घरी परतल्यावर त्याला चपात्या बनवल्या नसल्याचं दिसलं. यावर तो संतापला. त्याने मोठ्या भावाला विचारले, ‘तू चपाती का बनवली नाहीस?’ त्यावर मोठा भाऊ म्हणाला, ‘तू बनव, मी बनवणार नाही’. या लहानशा गोष्टीवरून दोन भावांमध्ये मोठं भांडण झाले. काही वेळातच भांडण वाढलं. दरम्यान, धाकट्याने घराबाहेर ठेवलेला दगड उचलून मोठ्या भावावर हल्ला केला. त्याने भावावर एकामागून एक दगड मारून त्याचा खून केला. भावाची हत्या करूनही तो थांबला नाही. त्यानंतर त्याने भावाचा मृतदेह दोरीने बांधून गावाबाहेर खेचून नेला. जवळच गंगा नदी आहे. त्याची बोट तिथेच होती. त्याने मृतदेह त्याच रात्री गंगेत फेकून दिला. मृतदेह घेऊन जात असताना रस्त्यात रक्त सांडलेलं होतं. सकाळी गावातील लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.

    #police Crime murder
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.