मुंबई : वृत्तसंस्था
चित्रपट क्षेत्रात गेल्या काही दिवसापूर्वी मोठी खळबळ उडवून देणारी बातमी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे उडाली होती. सध्या नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं. यादरम्यान आता नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रकांत देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत.
नितीन देसाई हा एक चांगला माणून होता. ते फार मेहनती होते. माझे वैयक्तिक फार चांगले संबंध होते. पण देशाला आणि महाराष्ट्राला कळले पाहिजे की, त्यांनी स्टुडिओ विकत द्यावा असा कोणाचा दबाव त्यांच्यावर होता? तर माझ्या माहितीनुसार उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा होता. इतकेच नाही तर राणे यांनी एनडी स्टुडिओ आम्हाला विका अशा धमक्या मातोश्रीच्या निगडीत माणसाने नितीन देसाई यांना दिल्या होत्या, असा आरोप देखाल यावेळी केला.