Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा !
    क्राईम

    धक्कादायक : आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा !

    editor deskBy editor deskAugust 28, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सांगली : वृत्तसंस्था

     

    राज्याला हादरविणारी घटना सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात घडली आहे. आश्रमशाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

    जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम असं आहे. हा प्रकार काल रात्री उशिरा घडला आहे. सुरुवातीला विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ सुरु झाली. अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास सुरु झाल्याने आश्रम शाळेतील कर्मचारी सुद्धा एकदम घाबरुन गेले होते. मुलांना माडग्याळ मधील प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने दाखल करण्यात आले.

    १७० विद्यार्थी ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे आले होते. त्यापैकी ७९ पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचार घेत आहेत, त्याचबरोबर त्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. बाकीचे विद्यार्थी रुग्ण मिरज मधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

    ही घटना झाल्याचं समजल्यानंतर आरोग्य विभागाने तातडीने आरोग्य यंत्रणेने पाऊलं उचलल्याने इतक्या मोठया संख्येने विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर योग्य वेळेत उपचार करण्यात आले. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांचे वय साधारण पाच वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंत आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत.

    Food poison sangali
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पुणे जमीन घोटाळा : पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही? दमानियांचा थेट सवाल

    December 22, 2025

    बांगलादेशात राजकीय हिंसाचार वाढला : नेत्यावर घरात घुसून गोळीबार

    December 22, 2025

    जळगाव : धावत्या रेल्वेच्या धडकेत प्रौढाचा दुर्देवी मृत्यू !

    December 22, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.