Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेम विवाह केला नंतर डॉक्टर पती पोहचला थेट पोलिसात !
    क्राईम

    प्रेम विवाह केला नंतर डॉक्टर पती पोहचला थेट पोलिसात !

    editor deskBy editor deskAugust 21, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    देशभरात प्रेमातून लग्न होत असतेत पण काही प्रेम विवाह आहे जे अखेरच्या श्वासापर्यत टिकत असते तर काही विवाह अगदी शुल्लक कारणाने भांडण होत कुठल्याही टोकाला पोहचत असते. अशीच एक घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात बागदा येथे एका डॉक्टरने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर ही घटना त्याने आपल्या भावाला सांगितली. नंतर डॉक्टर थेट पोलीस ठाण्यात पोहचला. स्वतःला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. डॉक्टरने पत्नीच्या गळ्यातील नळीवर चाकू फिरवला. शनिवारी रात्री ही घटना उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या बागदा येथे घडली. आरोपी अरिंदम बाला हा मांडवाघाटा गावातील राहणारा आहे. अरिंदम हा २८ वर्षांचा असून व्यवसायाने डॉक्टर आहे. अरिंदम पीजीमध्ये एमडीचा अभ्यास करत आहे.

    दोन वर्षांपूर्वी अरिंदमचे लग्न नीलगंज येथील रत्नामा डे (वय २५ वर्षे) या युवतीशी झाले. लग्नानंतर त्यांचे आपसात पटत नव्हते. दोघांमध्ये नेहमी वाद होत असतं. आठ महिन्यांपूर्वी रत्नामा या सासर सोडून माहेरी गेल्या होत्या. शनिवारी रात्री अरिंदम रत्नामा यांना घरी घेऊन आला. वडील विवेकानंद बाला आणि अनिर्बान बाला यांना जेवण करायचे असल्याचे सांगून वरच्या खोलीत गेले.

    रविवारी सकाळी अरिंदम दुसऱ्या माळ्यावरून खाली आला. आपले वडील आणि भावाला सांगितले की त्याने पत्नीचा खून केला आहे. त्यानंतर ठाण्यात जाऊन त्याने आत्मसमर्पण केले. पोलीस घटनास्थळी पोहचली. त्यांनी मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठवले. खुनाचा गुन्हा दाखल केला. दोन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु, पत्नी कधी साथ देत नव्हती. रत्नामा या होमिओपॅथी डॉक्टर होत्या. त्यांचे अरिंदम यांच्याशी प्रेम होते. त्यानंतर त्यांनी लग्न केले होते. रत्नामा आपल्या पतीशी वाद होत असल्याने माहेरी गेली होती. शनिवारी रात्री अरिंदम पत्नीसह घरी आला. दुसऱ्या माळ्यावर दोघेही गेले. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या का केली हे पोलीस अरिंदमला विचारत आहेत. पती-पत्नीमधील वादाची ही आजची तिसरी घटना आहे. पहिली घटना हैदराबाद येथे घडली. पती पत्नीच्या वादातून पतीने आपल्या ९ वर्षीय मुलीला संपवले. दुसरी घटना ही मध्य प्रदेशात घडली. पत्नी माहेरी जात असल्याने पतीने थेट गोळीबार केला. यात तीन जण ठार झाले. आणि तिसऱ्या घटनेत, डॉक्टर पतीने पत्नीला ठार केली.

    #police doctor Love marriage
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    तीन दुचाकीसह चोरटा पारोळा पोलिसांच्या ताब्यात !

    November 15, 2025

    राज्यातील उमेदवारांना मोठा दिलासा :राज्य निवडणूक आयोगाने घेतला महत्वाचा निर्णय !

    November 15, 2025

    महसूल पथकाची धाड नदीपात्रात कोट्यावधीची वाळू जप्त !

    November 15, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.