• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा द्या, आमदार सत्यजित तांबे यांची सभागृहात मागणी

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
July 29, 2023
in अमळनेर, जळगाव, राज्य
0

निम्न तापी पाडळसे प्रकल्प २५ वर्षे रखडल्याने प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला

प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, सत्यजित तांबे यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी

प्रतिनिधी जळगाव: जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. निम्न तापी पाडळसे प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे दरवर्षी १० हजार दशलक्ष घनमीटर पाणी येथून वाहून जात आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे 54 हजार 936 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून अलिप्त राहिले आहे. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी शासनाकडे वेळोवेळी केली आहे. त्यानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाने अशाप्रकारचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

रोकडेश्वर सहकारी उपसा सिंचन योजना संस्थेला सव्वा दोन कोटीचे अनुदान द्या

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावातील श्री रोकडेश्वर सहकारी उपसा सिंचन योजना क्रमांक एक या संस्थेसाठी ऊर्जा निर्मिती व एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्याकरिता सव्वा दोन कोटीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. या संस्थेला महावितरण कडून फक्त आठ तास वीज पुरवली जाते. मात्र हा वीज पुरवठा अत्यंत कमी असल्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेस लाईन टाकणे व सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे गरजेचे असल्याचे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.

Previous Post

अवमानजनक वक्तव्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल !

Next Post

अमळनेर मंगळग्रह मंदिरातून महिलेचे दागिने लंपास !

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

अमळनेर मंगळग्रह मंदिरातून महिलेचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group