Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा द्या, आमदार सत्यजित तांबे यांची सभागृहात मागणी
    अमळनेर

    अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा द्या, आमदार सत्यजित तांबे यांची सभागृहात मागणी

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 29, 2023Updated:July 29, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    निम्न तापी पाडळसे प्रकल्प २५ वर्षे रखडल्याने प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला

    प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, सत्यजित तांबे यांची विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मागणी

    प्रतिनिधी जळगाव: जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. निम्न तापी पाडळसे प्रकल्प गेल्या २५ वर्षांपासून रखडलेला आहे. हा प्रकल्प रखडल्यामुळे प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला आहे. प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे दरवर्षी १० हजार दशलक्ष घनमीटर पाणी येथून वाहून जात आहे. हा प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे 54 हजार 936 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यापासून अलिप्त राहिले आहे. या प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करून सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी, अशी मागणी जळगाव परिसरातील ग्रामस्थांनी शासनाकडे वेळोवेळी केली आहे. त्यानुसार तापी पाटबंधारे विकास महामंडळाने अशाप्रकारचा प्रस्ताव सुद्धा शासनाकडे पाठवला आहे. त्यामुळे निम्न तापी पाडळसे प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली आहे.

    रोकडेश्वर सहकारी उपसा सिंचन योजना संस्थेला सव्वा दोन कोटीचे अनुदान द्या

    अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन या गावातील श्री रोकडेश्वर सहकारी उपसा सिंचन योजना क्रमांक एक या संस्थेसाठी ऊर्जा निर्मिती व एक्सप्रेस फिडर लाईन टाकण्याकरिता सव्वा दोन कोटीचे अनुदान देण्यात यावे अशी मागणी सत्यजित तांबे यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली आहे. या संस्थेला महावितरण कडून फक्त आठ तास वीज पुरवली जाते. मात्र हा वीज पुरवठा अत्यंत कमी असल्यामुळे या ठिकाणी एक्सप्रेस लाईन टाकणे व सौर ऊर्जा प्रकल्प राबवणे गरजेचे असल्याचे मत सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    नशिराबाद नगरपालिकेचा निकाल जाहीर; नगराध्यक्षपदी योगेश पाटील !

    December 21, 2025

    मुक्ताईनगरमध्ये सत्ता बदलाचा धक्का; रक्षा खडसे यांची प्रतिष्ठा पणाला, संजना पाटील विजयी

    December 21, 2025

    मोठी बातमी : मतमोजणीला सुरुवात, भाजप पुढे; महायुती 150 जागांवर आघाडीवर !

    December 21, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.