Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उष्माघातात मृत झालेल्या कुटुंबाना मदत द्या : आ.खडसेंनी केली मागणी !
    जळगाव

    उष्माघातात मृत झालेल्या कुटुंबाना मदत द्या : आ.खडसेंनी केली मागणी !

    editor deskBy editor deskJuly 26, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्ना द्वारे विधानपरिषद सभागृहात केली यावेळी आ.एकनाथराव खडसे म्हणाले राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात ११ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे शासनाने जाहीर केले आहे तसेच जळगाव जिल्ह्यात सुद्धा उष्माघातामुळे बऱ्याच नागरिकांचा मृत्यू झालेला आहे हे खरे आहे काय, असल्यास, उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना शासनाकडून किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत मिळणेबाबत मा.लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे दिनांक १४ मे २०२३ रोजी पत्रव्यवहार करून मागणी केलेली आहे असे असल्यास, उष्माघाताने होणाऱ्या मृत्युंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांचे कुटुंबियांना शासनाकडून किमान ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी एकनाथराव खडसे यांनी केली. याला आपत्ती व्यवस्थापन मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिले खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे जळगाव येथे २ उष्माघात संशयीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिनांक १४ मे २०२३ चे निवेदन विभागास प्राप्त झाले नाही राज्यात उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती म्हणून अधिसूचित केली नसून ती अधिसूचित करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन आहे. तथापि, खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू पावलेल्या १४ नागरिकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लक्ष देण्यात आले आहेत असे मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.