• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्वीकारला पदभार

editor desk by editor desk
July 24, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य, राष्ट्रीय, सामाजिक
0
प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (दि.२४ जुलै) पदभार स्वीकारला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.

श्री. आयुष प्रसाद यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते. भारतीय प्रशासकीय सेवा २०१५ बॅचचे ते अधिकारी आहे‌त‌. धाराशिव (उस्मानाबाद) व खेड (पुणे) येथे परीक्षाविधीन म्हणून प्रांताधिकारी पदावर कामकाज तसेच अकोला येथे जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर त्यांनी यापूर्वी काम केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या प्रशासकीय सेवेत जिल्हाधिकारी या पदावर ते प्रथमच जळगाव येथे कामकाज सांभाळणार आहेत‌.

जिल्हधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.प्रसाद यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील पावसाची सद्यस्थिती, अतिवृष्टी आदी बाबींचा आढावा घेतला. जळगाव जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित पन्नू , पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, महानगरपालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, शहर अभियंता चंद्रकांत सोनगिरे तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते .

यावेळी श्री.प्रसाद यांनी जिल्ह्यातील माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, माहिती -तंत्रज्ञानाच्या सोबतीला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ई-गव्हर्नस द्वारे कारभार करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर राहणार आहे. जिल्हा प्रशासनाचे कामकाज पारदर्शक व गतिमान पद्धतीने चालवण्यात येईल. भूसंपादनाअभावी रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यात येतील. वाळू धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. सण-उत्सवाच्या काळात जिल्ह्यात शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण ठेवण्यावर प्रशासनाचा भर राहील. एक गाव-एक गणेशोत्सव ची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात येणार येईल. जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. नव मतदारांनी मतदार म्हणून नोंदणी करावी‌.असे आवाहन ही श्री.प्रसाद यांनी यावेळी केले.

Previous Post

मोठी बातमी : गुजरात संकटात ; इमारत कोसळून 4 जण अडकले

Next Post

दिल्लीत राज्यातील माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका

Next Post
दिल्लीत राज्यातील माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका

दिल्लीत राज्यातील माजी आमदार जाधवांना हृदयविकाराचा झटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्राईम

गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाखांचा ऐवज जप्त !

July 21, 2025
सुनील तटकरेंनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

सुनील तटकरेंनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला ; जरांगे पाटलांचा हल्लाबोल !

July 21, 2025
२२ मिनिटांत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
क्राईम

२२ मिनिटांत दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी

July 21, 2025
२० वर्षीय विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

२० वर्षीय विद्यार्थिनीने घेतला टोकाचा निर्णय !

July 21, 2025
लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !
क्राईम

लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !

July 21, 2025
नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !
क्राईम

नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !

July 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp