जळगाव : प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील वनी गडाहून येत असताना एका घाटात महामंडळाची बस ४०० फूट दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात एक महिलेचा मृत्यू झाला असून तर १५ जण जखमी झाल्याची माहिती करताच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांची काळजी घेण्याचे सांगत शासनाकडून योग्य ती मदत मिळवून देऊ असं देखील गुलाबराव पाटील यांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील तब्बल 15 भाविक या अपघातग्रस्त बस मध्ये प्रवास करीत असताना त्यांना देखील जखमी झाले असून त्यांची विचारपूस पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फोन द्वारे करीत प्रशासनाला योग्य ते आदेश देखील दिले असल्याचे समजते.