Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ; तीन जण वाहिले तर एकाचा मृत्यू !
    जळगाव

    जिल्ह्यात पावसाचा हाहाकार ; तीन जण वाहिले तर एकाचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJuly 6, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यात बदलत्या हवामानामुळे काही भागात जोरदार पावसाचे आगमन मध्यरात्री झाले पण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसाने मोठे नुकसान देखील केले आहे. दि.५ रोजीच्या रात्री जोरदार कोसळलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना अचानक पूर आला असून रावेर तालुक्यात तीन जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर रावेर शहरातील दोन जण बेपत्ता आहेत. यात बेपत्ता असलेल्यांमध्ये रावेर शहरातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पहिल्या पावसाने मोठी दाणादाण उडाली असून रावेर तालुक्यात बुधवारी रात्री अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक पावसाने जोर पकडला आणि दोन ते तीन तास मुसळधार पावसाने तांडव केला. यात रावेर तालुक्यातील नागझिरी, अभोडा आणि मात्रान या नद्यांना पूर आल्याने एकच धावपळ उडाली. यात रावेर शहरातील माजी नगरसेवक यांच्यासह एक जण दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे दोघे बेपत्ता झाले आहेत. तर मोरव्हाल येथील अभोडा नदीत एका जणाचा मृत्यू झाला आहे. मोरव्हाल येथे बाबुराव रायसिंग बारेला याचा मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. तर इतर दोघांचा रात्रीपासून शोध सुरू आहे. दोघे ज्या दुचाकीवरून जात होते ती दुचाकी आढळली असून दोघांचा मात्र अद्याप पर्यंत शोध लागलेला नाही. या घटनेनं तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

    रावेर तालुक्यातील रमजीपुर, रसलपुर, खिरोदा गावांमध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच रमजीपुरमध्ये आलेल्या पुरामुळे चार गुरे वाहून गेले आहेत. दरम्यान, घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुराच्या पाण्यात गुरे सुद्धा वाहून गेले असून त्याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. एक चारचाकी गाडी वाहून गेली. गाडीतील प्रवासी यांनी वेळीच गाडीतून उडी घेत ते बाहेर पडल्याने सुदैवाने सर्व प्रवासी बचावले आहेत. दरम्यान याठिकाणी रात्रीपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने बचावकार्य सुरु असून नागरिकांचे प्राण वाचविण्यात आले. नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बेपत्ता नागरिकांचा तपास तसेच मदतकार्य करण्याचे काम सुरू आहे. रावेर तालुक्याचे तहसीलदार बंडू कापसे नुकसानग्रस्त भागातल्या नागरिकांच्या संपर्कात आहेत. महसूल प्रशासन तालुक्यात अजून कुठे नुकसान झाले आहे? याचा शोध घेत आहेत. सदर नुकसानीचे पंचनामे करून अंतिम अहवाल देण्याचे काम सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या; खान्देशात घडली धक्कादायक घटना !

    November 16, 2025

    महिलांनी केले अश्लील हावभाव : चाळीसगाव पोलिसांनी घेतले ताब्यात !

    November 16, 2025

    पहाटेच्या कारवाईत विना परवाना वाळू वाहतूक पकडली

    November 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.